शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

विरोधकांसह सत्ताधारीही पाण्यासाठी आक्रमक

By admin | Updated: May 21, 2014 00:59 IST

नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या दाव्याची मंगळवारी नगरसेवकांनी सभागृहात हवा काढली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सत्ताधारी

नागपूर : नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याबाबत महापालिकेच्या दाव्याची मंगळवारी नगरसेवकांनी सभागृहात हवा काढली. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह सत्ताधारी नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेतली. प्रभागांमध्ये होत असलेला अनियमित पाणीपुरवठा, यामुळे नागरिकांना होणारा त्रास व नगरसेवकांवर ओढवणारी नाराजी महापौरांसमोर मांडण्यात आली. सुमारे दोन तास पाणी प्रश्नावर वादळी चर्चा झाली. मुस्लिम लीगचे असलम खान यांनी सांगितले की, १४ एप्रिल रोजी महेंद्रनगर जलकुंभावरून १० टँकर बंद करण्यात आले. तोडफोड केली म्हणून एका टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. टँकर बंद केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. नगरसेवकांनी या विरोधात आवज उठविला तर ओसीडब्ल्यू पोलिसात तक्रार दाखल करते. एका जलकुंभावरून टँकरच्या २० स्लीप निघतात. प्रत्यक्षात दोनच टँकर नागरिकांपर्यंत पोहचतात, असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे म्हणाले, बाबुळबन येथे जलकुंभाचे काम सुरू होऊ शकले नाही. यावर आयुक्त श्याम वर्धने यांनी नागरिक व आमदाराच्या विरोधामुळे काम सुरू झाले नसल्याचे स्पष्ट केले. आता सर्व अडथळे दूर झाले असून आठ दिवसात स्थायी समितीसमोर प्रस्ताव येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरीश डिकोंडवार यांनी नंदनवन भागात पाणी समस्या असल्याचे सांगितले. कामिल अन्सारी यांनीही पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी केली. सत्तापक्षनेते प्रवीण दटके यांनी जलप्रदाय विभाग जबाबदारीपासून दूर पळत असल्याचा आक्षेप घेतला. २५ लाख लोकसंख्या, ५० ते ६० जलकुंभांना फक्त १२ ते १५ अधिकार्‍यांच्या भरवशावर सोडता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे नगरसेवक दीपक कापसे म्हणाले, सक्करदरा येथील पाण्याची टाकी भरत नाही. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. म्हाळगीनगर जलकुंभातून अर्ध्या प्रभागाला पाणीपुरवठा होतो. येथूनन सध्या दिवसाआड पाणी दिले जाते. वीज ट्रीप झाली तर जलकुंभ भरत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दोन दोन दिवस पाणी मिळत नाही. (प्रतिनिधी)