शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

 शाळांतील खिचडी बंद पडण्याच्या वाटेवर; डिसेंबरनंतर तांदूळ मिळालाच नाही

By गणेश हुड | Updated: February 28, 2023 19:43 IST

नागपूरमधील अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. 

नागपूर: जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तादूळ पुरवठा मागील तीन महिन्यापासून बंद आहे. आधिच्या शिल्लक साठ्यातून खिचडी दिली जात आहे. जुना साठा संपल्याने ८ शाळांमध्ये खिचडी शिजली नाही. आठवडाभरात मार्च महिन्यासाठी तांदूळ मिळाला नाही तर शाळांतील खिचडी वाटप बंद पडणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. भारतीय अन्न महामंडळाकडून तांदूळ निःशुल्क देण्यात येतो. पण सरकारने शाळांना तांदुळाचा पुरवठा करण्यासाठी पुरवठादार नियुक्त केला नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.

वर्ग पहिला ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना आहे. नागपूर जिल्हयातील २७४८ शाळांतील ३ लाख १३ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यात जिल्हा परिषद,खासगी अनुदानित, महापालिकेच्या शाळांचा समावेश आहे. एक ते पाच वर्गांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०० ग्राम तांदूळ दिला जातो. तर वर्ग सहा ते आठपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५० ग्राम तांदूळ दिला जातो. मात्र मार्च महिन्यासाठी फेब्रुवारी महिन्यात तांदुळाचा पुरवठाच झालेला नाही. जुना साठा संपत आला आहे. साठा संपल्याने आठ शाळांतील विद्यार्थ्यांना खिचडी मिळालेली नाही. जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहार विभागातील अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. तेल, मिळाचे पैसे लवकर मिळत नाही२० ग्राम डाळ व इतर पोषण आहारामधील बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडू, हळद, मीठ, तिखट, भाजीपाला व इंधन खर्च शाळा व्यवस्थापनाला करावा लागतो. हा पैसा तीन- चार महिने मिळत नाही. पैसे वेळेवर मिळत नसल्याने महिला बचत गटांनी खिचडी वाटपाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना स्वत:हा खर्च करावा लागतो. शासनाकडून हा निधी कधी मिळेल याची तारीख ठरलेली नाही. डिसेंबर नंतर तांदूळ मिळाला नाहीजानेवारी महिन्यासाठी डिसेंबर महिन्यात तांदूळ मिळाला होता. त्यानंतर मिळालेला नाही. नवीन निविदा काढण्यात आल्या नसल्याचे गेल्या महिनाभरापासून पोषण आहारवाटप विस्कळीत झाले आहे. सध्या शिल्लक साठ्यातून खिचडी वाटप सुरू आहे

 

टॅग्स :nagpurनागपूर