शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’च्या मागणीसाठी क्रांतियात्रा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:56 IST

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांचे संयुक्त आयोजन : ६० चित्ररथातून जीवनकार्याचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.राष्ट्रीय  ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय  अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत या आयोजनाबाबत माहिती दिली. स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या दाम्पत्याला आतापर्यंत भारतरत्न मिळायला हवा होता. आता तरी उशीर न करता फुले दाम्पत्यास हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी त्यांनी केली. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून क्रांतियात्रेला सुरुवात होणार आहे. चंदननगर, क्रीडा चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा रोड, उदयनगर, जुना सुभेदार व सक्करदरा मार्गे होत रेशीमबागच्या सभागृहात सकाळी ११ वाजता यात्रेचा समारोप होईल. या क्रांतियात्रेत ६० चित्ररथांचा समावेश राहणार असून यातून महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आदी समाजसुधारकांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविले जाईल. पत्रपरिषदेत महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, गिरीश पांडव, शकील पटेल आदी उपस्थित होते.ओबीसीमध्ये मराठ्यांच्या समावेशाला विरोधमराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश आम्हाला मान्य नाही, असे बबनराव तायवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे व त्यामानाने आरक्षणाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यामुळे सरकारने मराठ्यांसाठी स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करावी. ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट होऊ देणार नाही व त्याचा जाहीर विरोध करू, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नागपूरला येणाऱ्या कमिटीला याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक