शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

फुले दाम्पत्यास ‘भारतरत्न’च्या मागणीसाठी क्रांतियात्रा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:56 IST

क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांचे संयुक्त आयोजन : ६० चित्ररथातून जीवनकार्याचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, या मागणीसाठी ११ एप्रिल रोजी क्रांतियात्रा काढण्यात येणार आहे. महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने बहुजन समाजातील पुरोगामी विचाराने कार्य करणाऱ्या ५० च्या जवळपास सामाजिक संघटनांतर्फे महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ही क्रांतियात्रा काढण्यात येत आहे.राष्ट्रीय  ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय  अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत या आयोजनाबाबत माहिती दिली. स्त्रीशिक्षण व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे कार्य अनन्यसाधारण आहे. त्यामुळे या दाम्पत्याला आतापर्यंत भारतरत्न मिळायला हवा होता. आता तरी उशीर न करता फुले दाम्पत्यास हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करावा, अशी मागणी त्यांनी केली. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता महात्मा फुले सभागृह, रेशीमबाग येथून क्रांतियात्रेला सुरुवात होणार आहे. चंदननगर, क्रीडा चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, मानेवाडा रोड, उदयनगर, जुना सुभेदार व सक्करदरा मार्गे होत रेशीमबागच्या सभागृहात सकाळी ११ वाजता यात्रेचा समारोप होईल. या क्रांतियात्रेत ६० चित्ररथांचा समावेश राहणार असून यातून महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आदी समाजसुधारकांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविले जाईल. पत्रपरिषदेत महात्मा फुले संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, गिरीश पांडव, शकील पटेल आदी उपस्थित होते.ओबीसीमध्ये मराठ्यांच्या समावेशाला विरोधमराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश आम्हाला मान्य नाही, असे बबनराव तायवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसीमध्ये अनेक जातींचा समावेश आहे व त्यामानाने आरक्षणाचे प्रमाण आधीच कमी आहे. त्यामुळे सरकारने मराठ्यांसाठी स्वतंत्रपणे आरक्षणाची तरतूद करावी. ओबीसी आरक्षणात त्यांना समाविष्ट होऊ देणार नाही व त्याचा जाहीर विरोध करू, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नागपूरला येणाऱ्या कमिटीला याबाबत निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक