शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आरपीएफकडून मौल्यवान चिजवस्तू 'ज्यांच्या त्यांना' परत; ५१:१३ लाखांचे साहित्य पोहचले मूळ मालकाकडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2023 20:33 IST

Nagpur News रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने मे - २०२३ मध्ये 'ऑपरेशन अमानत' राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला ५१:१३ लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला.

नागपूर : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ)ने मे - २०२३ मध्ये 'ऑपरेशन अमानत' राबवून चोर- भामट्यांकडून जप्त केलेला ५१:१३ लाखांचा ऐवज रेल्वे प्रवाशांना परत केला. चोरी गेलेला, हिसकावून नेलेला माैल्यवान दागिना अथवा चिजवस्तू अनपेक्षीतपणे परत मिळाल्याने ११९ प्रवासी आनंदले आहेत.

प्रवासाच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे जरा का लक्ष विचलित झाले तर चोर, भामटे हात दाखवितात. कधी कुुणाची दागिने आणि रोख तसेच माैल्यवान चिजवस्तू असलेली पर्स लांबविली जाते. कुणाचे मंगळसूत्र तर कुणाचा मोबाईल लंपास केला जातो. यामुळे अस्वस्थ झालेले प्रवासी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करतात. नंतर पोलीस त्याचा शोध घेतानाच संबंधित चोरीच्या गुन्ह्याची तक्रार वजा माहिती आरपीएफलाही कळविते.

रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करण्याची दुहेरी जबाबदारी सांभाळणारे आरपीएफचे जवान टप्प्यात आलेल्या चोर भामट्यांना कधी धावत्या रेल्वेत तर कधी वेगवेगळ्या रेल्वेस्थानकावर पकडतात आणि नंतर चाैकशी करून त्याच्याकडून चोरीचे साहित्य जप्त करून त्याला रेल्वे पोलिसांच्या हवाली करतात. गेल्या मे महिन्यात आरपीएफने 'ऑपरेशन अमानत' राबवून ११९ चोरीच्या तक्रारीतील ५१ लाख, १३ हजारांचे साहित्य जप्त केले. हे साहित्य ज्या प्रवाशांचे आहे, त्यांची ओळख पटवून ते त्यांना परत करण्यात आले.

ज्यात रोख रक्कम, दागिने, मोबाईल, पर्स, बॅग, लॅपटॉप आणि अन्य माैल्यवान चिजवस्तूंचा समावेश आहे. 

टॅग्स :Policeपोलिस