शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विमा हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 21:13 IST

ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अ‍ॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५००० व तक्रारीच्या खर्चापोटी ३००० रुपये मंजूर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : अ‍ॅक्सिस बँक व मॅक्स इन्शुरन्स कंपनीला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राहकाची विमा पॉलिसी रद्द करून त्याला नियमाप्रमाणे देय होणारी हप्त्याची रक्कम ८ टक्के व्याजाने परत करण्यात यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने अ‍ॅक्सिस बँक वर्धा रोड व मॅक्स लाईफ इन्शुरन्स कंपनी यांना दिला आहे. व्याज ८ मे २०१४ पासून लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी ५००० व तक्रारीच्या खर्चापोटी ३००० रुपये मंजूर करण्यात आले आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला. मनिराम शुक्ला असे ग्राहकाचे नाव आहे. मंचमधील तक्रारीनुसार, शुक्ला यांचे अ‍ॅक्सिस बँक, वर्धा रोड येथे चालू खाते होते. त्यांनी स्वत:च्या भविष्याचा विचार करून मॅक्स इन्शुरन्स कंपनीकडून २३ एप्रिल २०१३ रोजी विमा पॉलिसी काढली. त्याचा वार्षिक हप्ता २ लाख ४६ हजार २९६.९७ रुपये होता. त्यानंतर शुक्ला यांनी काही कारणास्तव पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेऊन, मार्च-२०१४ मध्ये अ‍ॅक्सिस बँकेला त्याची माहिती दिली. तसेच, हप्त्याची रक्कम परत करण्याची विनंती केली. त्याकरिता १५ एप्रिल २०१४ रोजी बँक व कंपनीकडे प्रस्ताव सादर केला. परंतु, आवश्यक ते सर्व प्रयत्न करूनही शुक्ला यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता, तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.असे होते बँकेचे म्हणणेशुक्ला यांनी मॅक्स इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला. त्याकरिता बँक जबाबदार नाही. शुक्ला यांचे सर्व आरोप निराधार आहेत. त्यांनी विमा पॉलिसी काढताना अटी व शर्ती समजून स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तो करार शुक्ला व कंपनीला बंधनकारक आहे. शुक्ला यांनी पॉलिसी रद्द करण्यासाठी बँकेकडे चुकीने अर्ज सादर केला. तो अर्ज कंपनीकडे सादर करणे आवश्यक होते. परिणामी बँकेने शुक्ला यांना कोणत्याही प्रकारची दोषपूर्ण सेवा दिली नाही, असे बँकेच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले होते.शुक्ला यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केला नाही. त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन पॉलिसी काढली होती. त्यांना पॉलिसीचे दस्तऐवज देण्यात आले होते. शुक्ला यांच्या आरोपांत काहीच तथ्य नाही. त्यांनी विमा लवादमध्ये एक वर्षाच्या आत तक्रार दाखल करून वाद सोडवायला हवा होता. परंतु, शुक्ला यांनी तसे केले नाही. सदर तक्रार मंचमध्ये चालविली जाऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार खारीज करण्यात यावी, असे कंपनीने उत्तरात स्पष्ट केले होते.मंचचे निर्णयातील निष्कर्षउपलब्ध दस्तऐवजावरून शुक्ला यांनी कंपनीकडून पॉलिसी काढली होती, ही बाब सिद्ध होते. तसेच, त्यांनी बँक व कंपनीला विमा पॉलिसी रद्द करण्याबाबत वेळोवेळी कळविले होते. परंतु, कुणीही त्यांच्या विनंतीला प्रतिसाद दिला नाही. शुक्ला यांनी पॉलिसीच्या रकमेत नियमाप्रमाणे रक्कम कपात करून उर्वरित रक्कम परत करावी, असेही म्हटले होते. त्यानंतरदेखील त्यांना योग्य सेवा देण्यात आली नाही. परिणामी, शुक्ला नियमानुसार विमा हप्त्याची रक्कम मिळण्यास पात्र आहेत, असे निष्कर्ष मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर