शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दिसणारे हे ‘क्लायमेट चेंज’चेच परिणाम; 'नीरी'च्या वैज्ञानिकांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 07:00 IST

Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देदेशात लाखाे लाेक हाेणार ‘क्लायमेट रेफ्यूजी’

निशांत वानखेडे

नागपूर : बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेल्या ‘आर्क्टिक’मध्ये बर्फ वितळायला लागले आहे, टुंड्रा प्रदेशात तापमान वाढत असल्याने जंगलांना आगी लागत आहेत, अशा अनेक उदाहरणांसह क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हाेत असल्याचे आपण ऐकत असताे. मात्र आपल्याला काय हाेणार म्हणून दुर्लक्षित करूनही देताे. या साऱ्या दूरच्या गाेष्टी म्हणून साेडून देत असाल तर आपण माेठ्या संकटाकडे कानाडाेळा करताेय हे लक्षात घ्या. कारण आपल्या अवतीभाेवती घडणाऱ्या गाेष्टी हवामान बदलाचे संकेत देणाऱ्याच आहेत. वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या संशाेधकांनीही हवामान बदलाबाबत संशाेधन चालविले आहे. मागील काही वर्षात विदर्भात ऋतुचक्रामध्ये झालेल्या बदलाच्या अभ्यासातून काही संकेत देण्यात आले आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत आणखी गंभीर परिणाम अनुभवायला मिळतील.

हवामान बदलाचा जागतिक प्रभाव

1. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) आणि महासागरातील आम्लता वाढल्यामुळे प्रवाळ खडकांचे नुकसान

2. पूर, चक्रीवादळ, उष्णकटिबंधीय वादळे, उष्णतेच्या घटना, जंगलातील आग अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढली.

3. समुद्र पातळी वाढणे आणि किनारी पूर. मालदीव किंवा मॉरिशससारखे देश समुद्र पातळी वाढल्यास त्यांची लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी जमीन खरेदी करत आहेत.

4. बर्फमुक्त आर्क्टिक प्रदेश - जागतिक वातावरणीय तापमानात वाढ झाल्यामुळे, आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे आवरण वितळेल, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि उच्च अल्बेडो प्रदेश नष्ट होईल ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेल.

 

विदर्भात दिसणारे परिणाम

नागपूर विभागामध्ये १९७०-७९ च्या दशकाच्या तुलनेत मान्सून नंतरच्या आणि हिवाळ्याच्या हंगामात पाऊस कमी झाला आहे.

- १९७०-७९ च्या तुलनेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण १५ टक्के वाढले आहे.

- पावसाळ्यात पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण वाढले पण पावसाचे दिवस इतके कमी झाले आहेत की, भविष्यात पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

- यावरून मान्सूनच नाही तर एकूणच निसर्गचक्राची अनियमितता वाढेल व त्याचा कृषी आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम हाेईल.

टॅग्स :weatherहवामान