शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

विदर्भात दिसणारे हे ‘क्लायमेट चेंज’चेच परिणाम; 'नीरी'च्या वैज्ञानिकांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 07:00 IST

Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देदेशात लाखाे लाेक हाेणार ‘क्लायमेट रेफ्यूजी’

निशांत वानखेडे

नागपूर : बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेल्या ‘आर्क्टिक’मध्ये बर्फ वितळायला लागले आहे, टुंड्रा प्रदेशात तापमान वाढत असल्याने जंगलांना आगी लागत आहेत, अशा अनेक उदाहरणांसह क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हाेत असल्याचे आपण ऐकत असताे. मात्र आपल्याला काय हाेणार म्हणून दुर्लक्षित करूनही देताे. या साऱ्या दूरच्या गाेष्टी म्हणून साेडून देत असाल तर आपण माेठ्या संकटाकडे कानाडाेळा करताेय हे लक्षात घ्या. कारण आपल्या अवतीभाेवती घडणाऱ्या गाेष्टी हवामान बदलाचे संकेत देणाऱ्याच आहेत. वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या संशाेधकांनीही हवामान बदलाबाबत संशाेधन चालविले आहे. मागील काही वर्षात विदर्भात ऋतुचक्रामध्ये झालेल्या बदलाच्या अभ्यासातून काही संकेत देण्यात आले आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत आणखी गंभीर परिणाम अनुभवायला मिळतील.

हवामान बदलाचा जागतिक प्रभाव

1. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) आणि महासागरातील आम्लता वाढल्यामुळे प्रवाळ खडकांचे नुकसान

2. पूर, चक्रीवादळ, उष्णकटिबंधीय वादळे, उष्णतेच्या घटना, जंगलातील आग अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढली.

3. समुद्र पातळी वाढणे आणि किनारी पूर. मालदीव किंवा मॉरिशससारखे देश समुद्र पातळी वाढल्यास त्यांची लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी जमीन खरेदी करत आहेत.

4. बर्फमुक्त आर्क्टिक प्रदेश - जागतिक वातावरणीय तापमानात वाढ झाल्यामुळे, आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे आवरण वितळेल, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि उच्च अल्बेडो प्रदेश नष्ट होईल ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेल.

 

विदर्भात दिसणारे परिणाम

नागपूर विभागामध्ये १९७०-७९ च्या दशकाच्या तुलनेत मान्सून नंतरच्या आणि हिवाळ्याच्या हंगामात पाऊस कमी झाला आहे.

- १९७०-७९ च्या तुलनेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण १५ टक्के वाढले आहे.

- पावसाळ्यात पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण वाढले पण पावसाचे दिवस इतके कमी झाले आहेत की, भविष्यात पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

- यावरून मान्सूनच नाही तर एकूणच निसर्गचक्राची अनियमितता वाढेल व त्याचा कृषी आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम हाेईल.

टॅग्स :weatherहवामान