शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

विदर्भात दिसणारे हे ‘क्लायमेट चेंज’चेच परिणाम; 'नीरी'च्या वैज्ञानिकांनी दिले संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 07:00 IST

Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

ठळक मुद्देदेशात लाखाे लाेक हाेणार ‘क्लायमेट रेफ्यूजी’

निशांत वानखेडे

नागपूर : बर्फाळ प्रदेश म्हणून ओळख असलेल्या ‘आर्क्टिक’मध्ये बर्फ वितळायला लागले आहे, टुंड्रा प्रदेशात तापमान वाढत असल्याने जंगलांना आगी लागत आहेत, अशा अनेक उदाहरणांसह क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल हाेत असल्याचे आपण ऐकत असताे. मात्र आपल्याला काय हाेणार म्हणून दुर्लक्षित करूनही देताे. या साऱ्या दूरच्या गाेष्टी म्हणून साेडून देत असाल तर आपण माेठ्या संकटाकडे कानाडाेळा करताेय हे लक्षात घ्या. कारण आपल्या अवतीभाेवती घडणाऱ्या गाेष्टी हवामान बदलाचे संकेत देणाऱ्याच आहेत. वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या संशाेधकांनीही हवामान बदलाबाबत संशाेधन चालविले आहे. मागील काही वर्षात विदर्भात ऋतुचक्रामध्ये झालेल्या बदलाच्या अभ्यासातून काही संकेत देण्यात आले आहेत. त्यांच्या मते २०३० पर्यंत आणखी गंभीर परिणाम अनुभवायला मिळतील.

हवामान बदलाचा जागतिक प्रभाव

1. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान (एसएसटी) आणि महासागरातील आम्लता वाढल्यामुळे प्रवाळ खडकांचे नुकसान

2. पूर, चक्रीवादळ, उष्णकटिबंधीय वादळे, उष्णतेच्या घटना, जंगलातील आग अशा घटनांची वारंवारता आणि तीव्रता वाढली.

3. समुद्र पातळी वाढणे आणि किनारी पूर. मालदीव किंवा मॉरिशससारखे देश समुद्र पातळी वाढल्यास त्यांची लोकसंख्या स्थलांतरित करण्यासाठी जमीन खरेदी करत आहेत.

4. बर्फमुक्त आर्क्टिक प्रदेश - जागतिक वातावरणीय तापमानात वाढ झाल्यामुळे, आर्क्टिक प्रदेशातील बर्फाचे आवरण वितळेल, ज्यामुळे समुद्राची पातळी वाढेल आणि उच्च अल्बेडो प्रदेश नष्ट होईल ज्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढेल.

 

विदर्भात दिसणारे परिणाम

नागपूर विभागामध्ये १९७०-७९ च्या दशकाच्या तुलनेत मान्सून नंतरच्या आणि हिवाळ्याच्या हंगामात पाऊस कमी झाला आहे.

- १९७०-७९ च्या तुलनेत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण १५ टक्के वाढले आहे.

- पावसाळ्यात पावसाच्या दिवसांची संख्या कमी होत आहे. याचा अर्थ मान्सूनमध्ये पावसाचे प्रमाण वाढले पण पावसाचे दिवस इतके कमी झाले आहेत की, भविष्यात पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

- यावरून मान्सूनच नाही तर एकूणच निसर्गचक्राची अनियमितता वाढेल व त्याचा कृषी आणि दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम हाेईल.

टॅग्स :weatherहवामान