शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

गारपीटग्रस्तांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होणार

By admin | Updated: June 18, 2014 01:25 IST

ज्या शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आणि ज्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सहकार सचिवांनी दिले आहेत.

शासनाचा निर्णय : बँकांकडून मात्र शेतकऱ्यांची बोळवणहर्षल तोटे - पवनारज्या शेतकऱ्यांचे गारपीटीमुळे नुकसान झाले आणि ज्यांना शासनाच्या पॅकेजचा लाभ मिळाला अशा शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सहकार सचिवांनी दिले आहेत. या शेतकऱ्यांना थकीत कर्ज २०१४-१५, १५-१६ व १६-१७ अशा वार्षिक तीन हप्त्यात भरण्याची मुभा दिली आहे. सोबतच गारपीटग्रस्त थकीत शेतकऱ्यांना २०१४-१५ करिता कर्ज देण्याच्या सूचनासुद्धा बँकांना दिल्या आहेत. सदर योजना फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेती व फळ पिकांसाठी घेतलेल्या पीक कर्जास लागू राहणार आहे. २०१३-१४ या हंगामातील पीक कर्जाचे उपर्जित व्याज शासनामार्फत संबंधीत बँकांना अदा करण्यात येणार आहे. पुनर्गठनाचा लाभ घेणारे शेतकरी २०१४-१५ या हंगामात पीक कर्ज घेण्यास पात्र ठरतील; परंतु शासनाच्या या निर्णयाची अंमलबजावणी राष्ट्रीयकृत बँकांकडून होताना दिसत नाही. किंबहुना शासनाची ही माहिती बँकांनी दडवून ठेवली असून याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.आधी जुने कर्ज फेडा व मगच नवीन कर्जाबाबत मागणी करा अशी बँकांच्यावतीने तंबी देण्यात येत आहे. याबाबत कृषी विभाग सुद्धा अनभिज्ञ आहे. विभागातर्फे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक होते; शासन घोषणा करते, परिपत्रकही काढते; परंतु त्याची अंमलबजावणी होते किंवा नाही याचा आढावा घेताना दिसत नाही. खरीपाचा हंगाम सुरू झालेला असून येत्या आठ-दहा दिवसात शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला नाही तर खरीपाचा हंगाम वाया गेल्याशिवाय राहणार नाही.