शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
3
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
4
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
6
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
7
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
8
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
9
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
10
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
11
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
12
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
13
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
14
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
15
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
16
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
17
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
18
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
19
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
20
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर

रेस्टॉरन्ट, बारचालकांना नियमांचे ‘बंधन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 21:45 IST

अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे.

ठळक मुद्दे करावे लागणार सर्व नियमांचे पालन : शासनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉक-५ मध्ये रेस्टॉरन्ट आणि बीअरबार सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सात महिन्यांपासून बंद असलेले रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये ५ आॅक्टोबरपासून उत्साह संचारणार आहे. पण मालकांना राज्य शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून संचालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार आहेत.रेस्टॉरन्ट आणि बार व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो लोक जुळले आहेत. नागपुरात अडीच हजारांपेक्षा जास्त रेस्टॉरन्ट आणि तेवढेच फूटपाथवर खाद्य विक्रेते आहेत. या माध्यमातून जवळपास २५ ते ३० हजार लोकांना पुन्हा रोजगार उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरन्ट व्यवसायाशी जुळलेल्या असोसिएशनसोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. ५० टक्के उपस्थितीसह परवानगी दिली आहे. एका टेबलवर दोन वा तीन व्यक्तींना बसण्याची परवानगी राहणार आहे. सप्टेंबर महिन्यात अनलॉक-४ मध्ये केंद्र सरकारने या संदर्भात निर्णय घेण्याचे आवाहन राज्य शासनाला केले होते. या अंतर्गत काही राज्यात रेस्टॉरन्ट सुरू झाले आहेत. पण महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता शासनाने रेस्टॉरन्ट आणि बार पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली नव्हती.

पुरवठादारांचा कच्च्या मालाचा व्यवसाय वाढणारनागपुरात रेस्टॉरन्ट आणि बारची संख्या जास्त आहे. या प्रतिष्ठानांमध्ये असंघटित क्षेत्रातील सर्वाधिक लोक काम करतात. त्यांना रोजगार मिळणार आहे. याशिवाय रेस्टॉरन्ट आणि बारमध्ये तयार होणाऱ्या पदार्थांसाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचा व्यवसाय वाढणार आहे. पूर्वी काऊंटरवरून मद्य विक्रीला परवानगी होती. पण बार सुरू होताच ग्राहकांची संख्या वाढेल, असे बार संचालकांनी सांगितले. याशिवाय फूटपाथवर विक्री करणाऱ्या खाद्य विक्रेत्यांच्या व्यवसायात वाढ होणार आहे.हॉटेल व रेस्टॉरंट संचालकांनी सांगितले की, पूर्वी पार्सलला परवानगी होती. आता शासनाच्या परवानगीने व्यवसायात पुन्हा उत्साह येणार आहे. ग्राहकांना कोरोना नियमांचे पालन करून रेस्टॉरन्टमध्ये यावे लागेल. याशिवाय आम्हीही नियमांतर्गत व्यवसाय चालविणार आहोत. एका वा दोन दिवसात शासनाची नियमावली येणार आहे.असे असतील नियमरेस्टॉरन्ट व बारमध्ये ५० टक्के अर्थात एका टेबलवर दोन वा तीन जणांना परवानगीसॅनिटायझरची व्यवस्था मालकांना करावी लागणारग्राहकांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारककर्मचाऱ्यांना मास्क व ग्लोव्हज बंधनकारकवेळेचे बंधन पाळावे लागणाररेस्टॉरन्ट व बार नियमित सॅनिटाईज करणे बंधनकारक

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर