शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

डाळींच्या आयातीवर निर्बंध जारी राहणार : केंद्राचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 22:36 IST

डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत टाकलेले निर्बंध हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळींच्या पिकाला रास्त भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थिती स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डाळींच्या आयातीवर केंद्र सरकारने ३१ मार्च २०१९ पर्यंत टाकलेले निर्बंध हटविण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना डाळींच्या पिकाला रास्त भाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना पिकाची योग्य किंमत मिळावी, या उद्देशाने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक निर्बंध लावले होते. गेल्यावर्षी डाळींचे उत्पादन विक्रमी झाल्यानंतर बाजारात शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळत नव्हता. एवढेच नव्हे तर डाळींची आयात मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आधारभाव मूल्यांहून कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी त्रस्त होते. गेल्यावर्षी देशात सर्व प्रकारच्या डाळींचे उत्पादन २२५ लाख टन झाले होते. मागणी आणि पुरवठा तफावत न राहिल्यामुळे डाळींच्या भावात प्रचंड घसरण झाली होती. सरकारने साठवणुकीची मर्यादा हटवून डाळींची निर्यात सुरू केली होती. त्यानंतरही डाळींचे भाव वाढले नव्हते. शेतकऱ्यांना जास्त भाव मिळावा म्हणून अखेर सरकारने डाळींच्या आयातीवर मात्रात्मक प्रतिबंध लावले.वाटाण्याच्या आयातीवर प्रतिबंध आणि मसूर, हरभऱ्याच्या आयातीवर शुल्क वाढविले. पण एका याचिकेवर सुनावणी करताना चेन्नई उच्च न्यायालयाने सरकारच्या डाळीच्या आयातीच्या निर्णयावर स्टे दिला होता. त्यामुळे व्यापाऱ्यातर्फे चेन्नई येथून डाळींची आयात सुरू झाल्यानंतर सरकारच्या प्रयत्नांना अपयश आले होते. १५ दिवसांपूर्वी चेन्नई उच्च न्यायालयात सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी निर्णय सुरक्षित ठेवला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास अडचण येत होती. पण मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थिती स्पष्ट झाली असून आयातीवर निर्बंध लावण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरविला आहे. यापूर्वी डीजीएफटीकडे आयातीवर प्रतिबंध लावण्याचा अधिकार असल्याचे सांगून गुजरात उच्च न्यायालयाने स्टे देण्यास नकार दिला होता. आता डाळींच्या आयातीवर टाकलेले प्रतिबंध अधिकृत झाले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने चेन्नई, अहमदाबाद, जयपूर आणि अन्य राज्यातील हायकोर्टाने डाळींच्या आयातीविरोधात सरकारच्या निर्णयावर दिलेले स्टे निरस्त करून केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरविला. आता हायकोर्टाला डाळींच्या आयात निर्बंधावर स्टे देता येणार नाही. या निर्णयाचे प्रताप मोटवानी यांनी स्वागत केले आहे.

 

टॅग्स :foodअन्नCentral Governmentकेंद्र सरकार