शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 20:00 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत नसल्याचे पाहत सायंकाळी ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेले. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहत मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. मुसळधार पावसातही मोर्चेकरी रस्त्यावर होते. हा मोर्चा चिघळण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

ठळक मुद्देराज्य कोतवाल संघटनेचा मोर्चा : मागणी मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन राज्य कोतवाल संघटनेच्या मोर्चाने पावसाळी विधिमंडळ अधिवेशनावर पहिल्याच दिवशी धडक दिली. राज्यभरातून सहभागी झालेल्या मोर्चेकरांनी दुपारपर्यंत महसूल मंत्री येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मंत्री येत नसल्याचे पाहत सायंकाळी ३० जणांचे शिष्टमंडळ भेटायला गेले. परंतु मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहत मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. मुसळधार पावसातही मोर्चेकरी रस्त्यावर होते. हा मोर्चा चिघळण्याच्या स्थितीत असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.मोर्चाचे नेतृत्व करणारे संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रवीण कर्डक व राज्य अध्यक्ष संजय धरम म्हणाले, २०१६च्या हिवाळी अधिवेशनात संघटनेकडून मोर्चा काढल्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक महिन्याच्या आत प्रश्न सुटेल, तुम्हाला या पुढे आंदोलन करण्याची गरज पडणार नाही, असे आश्वासन दिले होते. याचदरम्यान २८ डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘एक छत्र’ योजना तयार केली. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यात कोतवाल, पोलीस पाटील व आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना या योजनेत समाविष्ट केले. परंतु कोतवाल आणि आशा वर्कर या दोघांच्या कामात तफावत आहे. त्यांची तुलना कोतवालांबरोबर करू नये. कोतवालांची मागणी चतुर्थ श्रेणी असल्याचे रेटून धरले. राज्यात १२ हजार ६३७ कोतवाल आहेत. पाच हजार रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता मिळतो. एवढ्या पैशांमध्ये जगायचे कसे, हा प्रश्न आहे. गेल्या ६८ वर्षांपासून शासनदरबारी कोतवालांना न्याय न मिळाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली.मोर्चेकरी भिजलेसायंकाळी झालेल्या जोरदार पावसातही मोर्चेकरांनी आपली जागा सोडली नव्हती. याच दरम्यान ३० जणांचे शिष्टमंडळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटायला गेले होते. मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती. दिवसभर मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत हल्लाबोल केला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा