शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
6
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
7
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
8
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
9
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
10
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
11
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
12
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
14
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
15
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
16
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
17
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
18
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
19
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
20
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?

आयकरची विवादित प्रकरणे सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

नागपूर : आयकर विभागाने करदात्यांना आपले विवाद सोडविण्याची सुवर्ण संधी दिली आहे. जीएसटीच्या धर्तीवर आयकर प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विभागाने ...

नागपूर : आयकर विभागाने करदात्यांना आपले विवाद सोडविण्याची सुवर्ण संधी दिली आहे. जीएसटीच्या धर्तीवर आयकर प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विभागाने ‘विवाद से विश्वास’ योजना आणली आहे. या योजनेंतर्गत आयकरची अनेक वर्षांपूर्वीची विवादित प्रकरणे सोडविण्याचे आवाहन आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त राजेश रंजन प्रसाद यांनी करदात्यांना येथे केले.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने आयकर प्रकरणे सोडविण्याच्या विषयावर आयोजित चर्चासत्रात मुख्य अतिथी म्हणून प्रसाद बोलत होते. याप्रसंगी उपायुक्त वीरेंद्रकुमार, वरिष्ठ सीए राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते. प्रसाद म्हणाले, आयकर विभागाकडे अनेक वर्षांपासून विविध प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे निकाली काढण्यासाठी आयकर विभागाने ही योजना आणली आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने होणार आहे. या योजनेंतर्गत करदात्यांना किमान खर्च येणार आहे. दंड आणि व्याज माफ करण्यात येत आहे. ही योजना आणून सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला आहे. याकरिता विभागाने वेगळी चमू तयार केली असून, करदात्यांना मार्गदर्शन करीत आहे.

या योजनेची घोषणा बजेटमध्ये करण्यात आली होती. हजारो लोकांनी आतापर्यत फायदा घेतला आहे. आतापर्यंत विविध अपिलीय प्राधिकरणाकडे ४ लाख ८३ हजार प्रकरणे प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारी २००० पूर्वीची प्रकरणे अपील, रिट प्रिटिशन, आर्बिटेशनमध्ये आहेत, त्यांना या योजनेंतर्गत आणता येणार आहे. डीआरपी प्रकरणांचेही समाधान काढता येऊ शकते. कर, टीडीएस, टीसीआर आदींशी जुळलेल्या प्रकरणांचा योजनेंतर्गत विचार करण्यात येणार आहे. काही प्रकरणांमध्ये आयकर विभाग अपीलमध्ये गेला असेल आणि ५० टक्क्यांवर आदेश करदात्यांच्या बाजूने गेला असला तरीही करदात्यांना ५० टक्क्यांपेक्षा जास्तची सूट देण्यात येणार आहे.

प्रारंभी राजेश लोया म्हणाले, सीबीडीटीच्या आदेशानुसार ३१ डिसेंबरपूर्वीच्या प्रकरणांना समोर आणणे आवश्यक आहे. त्यांनी करदात्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. अशोक चांडक यांनी प्रामुख्याने स्वागत केले. सचिन जाजोदिया यांनी आभार मानले.