शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिरोध ही विवशता नव्हे साहस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:44 IST

आपला देश सध्या सामाजिक संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अभिव्यक्ती, अस्वीकृती आणि टीका हे संविधानाने बहाल केलेले मूलभूत अधिकार आज राष्ट्रद्रोह ठरायला लागले आहेत.

ठळक मुद्देमनोज रूपडा : ‘प्रतिरोध का सिनेमा’ फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपला देश सध्या सामाजिक संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. अभिव्यक्ती, अस्वीकृती आणि टीका हे संविधानाने बहाल केलेले मूलभूत अधिकार आज राष्ट्रद्रोह ठरायला लागले आहेत. विशेष म्हणजे, ही गळचेपी या देशाचे पालकत्व स्वीकारणारेच करताहेत. त्यामुळे त्यांच्याकडे न्यायाची दाद मागण्यात काहीच अर्थ नाही. अशा स्थितीत प्रतिरोध हा एकच पर्याय आहे. प्रतिरोध ही विवशता नाही तर साहसाचे कार्य आहे. हेच साहस ‘प्रतिरोध का सिनेमा’ तुमच्यात पेरणार आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकार मनोज रूपडा यांनी केले. ‘प्रतिरोध का सिनेमा’ या तीन दिवसीय फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन तरुणाईच्या भरगच्च उपस्थितीत धनवटे नॅशनल कॉलेज येथे पार पडले. यावेळी ते बोलत होते.धनवटे नॅशनल कॉलेज, दक्षिणायन, राष्ट्रभाषा परिवार, प्रगतिशील लेखक संघ, कलश तिरपुडे मित्र संस्था, इप्टा व मेर्की थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या चित्रपट महोत्सवात विविध विषयाला वाहिलेले चित्रपट, अ‍ॅनिमेशनपट, लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. यावेळी मंचावर संजय जोशी, रत्नाकर भेलकर व कलश तिरपुडे उपस्थित होते. या चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका सांगताना संजय जोशी म्हणाले, आम्ही गोरखपूरपासून या उपक्रमाची सुरुवात केली. सध्याचा सिनेमा खूप व्यवसायी होत चालला आहे. यात विचार कुठेच दिसत नाही. त्यामुळे समाजाला विचार देणारे चित्रपट आम्ही या महोत्सवात दाखवणार आहोत. यावेळी कलश तिरपुडे यांनीही विचार व्यक्त केले. उद्घाटनीय सत्राचे संचालन बसंत त्रिपाठी यांनी केले. यानंतर लगेच ‘सुरसुरी चाय’ व ‘हिटलर के साथी’ हे ‘प्रतिरोध का संगीत’ असलेले व्हिडिओ दाखविण्यात आले. या व्हिडिओला तरुणाईचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ते सध्याच्या राजकीय गळचेपीकडे कसे आणि किती संवेदनशील दृष्टीने बघताहेत हे स्पष्टपणे दर्शवित होता.तरुणाईला स्पर्शून गेली ‘गर्म हवा’१९७३ मध्ये एम.एस. सथ्यू यांनी तयार केलेल्या ‘गर्म हवा’ या हिंदी सिनेमाचे भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. संयुक्त भारताच्या फाळणीनंतर भारतातच राहिलेल्या मुसलमानांच्या आयुष्यातील दैनंदिन संघर्षाला हा चित्रपट अतिशय प्रामाणिकपणे प्रेक्षकांपुढे मांडतो. या चित्रपटात सथ्यू यांनी मांडलेली मिर्जा कुटुंबाची कथा आणि या कथेच्या अनुषंगाने फाळणीचे अदृश्य चटके हा चित्रपट पाहणाºया तरुणाईला प्रत्येक वळणावर जाणवत राहिले. देशाच्या फाळणीने ज्या जखमा दिल्या त्या कशा टाळता आल्या असत्या पण त्या टाळता आल्या नाही म्हणून आता त्या कशा जाणीवपूर्वक भळभळत ठेवल्या जात आहेत, याचे वास्तवदर्शी चित्रण दाखवून या चित्रपटाने तरुणाईला फाळणीमागच्या अस्पर्शित पैलूंचे विदारक दर्शन घडविले.आज महोत्सवातसकाळी पहिल्या सत्रात ‘गाडी लोहदरगा मेल’, ‘पी’, ‘अलाउद्दीन खान’, ‘यशपाल :अ लाईफ इन सायन्स’ हे चार लघुपट. दुपारच्या सत्रात ‘नवीन तंत्रज्ञानाच्या काळात नवा भारतीय सिनेमा’ या विषयावर संजय जोशी यांच्याशी चर्चा. संध्याकाळच्या सत्रात ‘मातीतली कुस्ती’, ‘अन्हे घोडे दा दान’ या दोन चित्रपटांचे सादरीकरण, अशी भरगच्च मेजवानी आहे.