शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

होमिओपॅथीमधील क्षमता सिद्ध करण्यास संशोधन आवश्यक; ‘अखिल भारतीय होमिओपॅथी रिसर्च समिट’ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2023 22:17 IST

Nagpur News आतापर्यंत होमिओपॅथीमध्ये जवळपास २० टक्केच संशोधन झाले, ते वाढविणे आवश्यक आहे, असे मत एमडी मेडिसिनसह होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉ. जसवंत पाटील यांनी व्यक्त केले.

नागपूर : होमिओपॅथीमध्ये गंभीरातील गंभीर आजार बरे करण्याची क्षमता आहे. ती सिद्ध करण्यासाठी संशोधनाची गरज आहे. आतापर्यंत होमिओपॅथीमध्ये जवळपास २० टक्केच संशोधन झाले, ते वाढविणे आवश्यक आहे, असे मत एमडी मेडिसिनसह होमिओपॅथी तज्ज्ञ असलेले डॉ. जसवंत पाटील यांनी व्यक्त केले.

सुरेश भट सभागृहात शनिवारपासून दोन दिवसीय ‘अखिल भारतीय होमिओपॅथी रिसर्च समिट’ला सुरुवात झाली. यादरम्यान ते ‘लोकमत’शी बोलत होते. ‘समिट’चे उद्घाटन माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. डॉ. पाटील म्हणाले, ज्या रुग्णांवर ॲलोपॅथी उपचारात मर्यादा येत होत्या त्यांच्यावर पुढील उपचारासाठी साडेचार वर्षे होमिओपॅथीचा अभ्यास केला. ‘ऑब्झर्व्हेशन रिसर्च’मधून कॅन्सरसह, हिमोफे लिआ, हृदयविकाराचा झटका आलेले, कोविडच्या गंभीर रुग्णांवर होमिओपॅथीने उपचार करून त्यांचे जीव वाचविले. होमिओपॅथीला पुढे नेण्यासाठी संशोधनाची व त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. या समिटमध्ये २५०० होमिओपॅथी तज्ज्ञ, एमडीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. नितेश दुबे हे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक असून, नागपूरचे डॉ. राजेश मुरकुटे, डॉ. मनीष पाटील, डॉ. रवी वैरागडे हे आयोजन समितीत आहेत.

यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेल्या रुग्णांना केले बरे 

केरळमधील डॉ. एस. जी. बिजू यांनी सांगितले, यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिलेल्या रुग्णांना होमिओपॅथीच्या उपचाराने बरे केले. ‘हिपॅटायटीस-बी’, वंध्यत्व, ल्युकेमिया यासारख्या अनेक आजारांवर होमिओपॅथीने उपचार केले आणि रुग्ण बरे झाले. याचे डाक्युमेंटेशन आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संधिवात, वंध्यत्व आणि ॲलर्जीच्या आजारांवरील उपचारांवर संशोधन करत आहोत, असेही ते म्हणाले.

‘अर्थरायटिस’वर होमिओपॅथीमध्ये संशोधन गरजेचे 

कोलकाता येथील डॉ. अनिर्बन सुकुल म्हणाले, शरीरातील सांधे, स्नायू यांच्यावर विविध कारणांनी येणारी सूज व त्यामुळे होणारा त्रास म्हणजे वातरोग (अर्थरायटिस). होमिओपॅथीमध्ये या रोगावर प्रभावी उपचार आहेत. याची लक्षणे कमी करता येऊ शकतात. या रोगावरील उपचारासाठी अनेक रुग्ण होमिओपॅथीकडे वळत आहेत. यात आणखी संशोधन होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. नागपूरचे डॉ. आदिल चिमथनवाला, मुंबईचे डॉ. मयुरेश महाजन यांनी होमिओपॅथीमधून बरे झालेल्या गंभीर रुग्णांची प्रकरणे सादर केली.

टॅग्स :Healthआरोग्य