शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ करणार खड्ड्यांवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:59 IST

खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनुकसानाचा करणार अभ्यास आर्थिक, आरोग्याच्या दृष्टीने तपासणार बाजू

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खड्डे आणि आर्थिक नुकसान ! वाचून थोडेसे आश्चर्य वाटेल व खरोखर खड्ड्यांमुळे आर्थिक फटका बसू शकतो का असा विचार डोक्यात येईल. मात्र खरोखर खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर वैज्ञानिक संशोधन होणार आहे. ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) याबाबतीत सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाची खड्डेपुराणात नेमकी भूमिका काय होती व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रामाणिकता दाखविली ही बाबदेखील समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नागपुरात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण वेगाने सुरू असले तरी दुसरीकडे अनेक डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांत खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. यावरच सखोल अभ्यासासाठी ‘व्हीएनआयटी’च्या ‘सिव्हिल इंजिनिअरींग’ विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातील प्रोफेसर विश्रृत लांडगे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे पथक शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तेथे पाऊस व अन्य कारणांमुळे रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांचे अध्ययन करतील. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला व सरकारला किती नुकसान झाले हा अभ्यासाचा मुख्य मुद्दा राहणार आहे. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे किती वाहने खराब झाली, अपघात झाले यावरदेखील अभ्यास करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगोदर किती खड्डे होते व आता किती खड्डे आहेत आणि खड्ड्यांना खरोखरच तांत्रिकदृष्ट्यादुरुस्त करण्यात आले आहे का याची चाचपणीदेखील करण्यात येईल.याबाबत डॉ.लांडगे यांना संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला होकार दिला. मात्र अभ्यास नेमका कशा पद्धतीने होईल, याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. हा अभ्यास १५ ते २० दिवस चालेल व सखोल संशोधनानंतर अहवाल तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासन अहवाल स्वीकारणार का ?मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाकडून खराब रस्ते व खड्डे दुरुस्तीचे दावे करण्यात येत आहे. नेमक्या याच कालावधीत ‘व्हीएनआयटी’कडून संशोधन होणार असल्याने दाव्यांमध्ये नेमके किती तथ्य आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र ‘व्हीएनआयटी’चा जो अहवाल असेल, त्याला प्रशासन प्रामाणिकपणे स्विकारेल की नाही, हा प्रश्न कायम आहे. सरकार व प्रशासन यांना मदत व्हावी याच उद्देशातून हे संशोधन करण्यात येणार आहे, असे डॉ.लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक