शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ‘व्हीएनआयटी’ करणार खड्ड्यांवर संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:59 IST

खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सखोल अभ्यास करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनुकसानाचा करणार अभ्यास आर्थिक, आरोग्याच्या दृष्टीने तपासणार बाजू

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खड्डे आणि आर्थिक नुकसान ! वाचून थोडेसे आश्चर्य वाटेल व खरोखर खड्ड्यांमुळे आर्थिक फटका बसू शकतो का असा विचार डोक्यात येईल. मात्र खरोखर खड्ड्यांमुळे नागपुरातील नागरिकांना किती प्रमाणात आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने नुकसान सहन करावे लागले यावर वैज्ञानिक संशोधन होणार आहे. ‘व्हीएनआयटी’कडून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) याबाबतीत सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. या अभ्यासातून मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाची खड्डेपुराणात नेमकी भूमिका काय होती व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रामाणिकता दाखविली ही बाबदेखील समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.नागपुरात रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण वेगाने सुरू असले तरी दुसरीकडे अनेक डांबरी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यांत खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. यावरच सखोल अभ्यासासाठी ‘व्हीएनआयटी’च्या ‘सिव्हिल इंजिनिअरींग’ विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातील प्रोफेसर विश्रृत लांडगे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे पथक शहरातील विविध भागांमध्ये जाऊन तेथे पाऊस व अन्य कारणांमुळे रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांचे अध्ययन करतील. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला व सरकारला किती नुकसान झाले हा अभ्यासाचा मुख्य मुद्दा राहणार आहे. खराब रस्ते व खड्ड्यांमुळे किती वाहने खराब झाली, अपघात झाले यावरदेखील अभ्यास करण्यात येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अगोदर किती खड्डे होते व आता किती खड्डे आहेत आणि खड्ड्यांना खरोखरच तांत्रिकदृष्ट्यादुरुस्त करण्यात आले आहे का याची चाचपणीदेखील करण्यात येईल.याबाबत डॉ.लांडगे यांना संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला होकार दिला. मात्र अभ्यास नेमका कशा पद्धतीने होईल, याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. हा अभ्यास १५ ते २० दिवस चालेल व सखोल संशोधनानंतर अहवाल तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासन अहवाल स्वीकारणार का ?मनपा, नासुप्र व जिल्हा प्रशासनाकडून खराब रस्ते व खड्डे दुरुस्तीचे दावे करण्यात येत आहे. नेमक्या याच कालावधीत ‘व्हीएनआयटी’कडून संशोधन होणार असल्याने दाव्यांमध्ये नेमके किती तथ्य आहे हे स्पष्ट होणार आहे. मात्र ‘व्हीएनआयटी’चा जो अहवाल असेल, त्याला प्रशासन प्रामाणिकपणे स्विकारेल की नाही, हा प्रश्न कायम आहे. सरकार व प्रशासन यांना मदत व्हावी याच उद्देशातून हे संशोधन करण्यात येणार आहे, असे डॉ.लांडगे यांनी सांगितले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक