शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

‘भिवापुरी’ मिरचीच्या उत्पादन वाढीसाठी संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 10:33 IST

भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.

ठळक मुद्देदोन ते तीन वर्षांत दिसणार परिणाम कृषी विद्यापीठांमध्ये करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भिवापुरी मिरचीला जगात मान्यता आहे. परंतु पारंपरिक लागवड आणि कीड रोगामुळे मिरचीचे उत्पादन व क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यावर शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर असून भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फलोत्पादन विभागातील सहयोगी प्राध्यापक एस.एम. घावडे यांनी याबाबत माहिती दिली. कृषी जिल्हा महोत्सवांतर्गत मिरची विक्री व व्यवस्थापन यावर ते मार्गदर्शन करीत होते. प्रा. घावडे यांनी सांगितले की, भिवापुरी मिरची ही जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रकारे आंध्र प्रदेशातील गुंटूर हे क्षेत्र संपूर्ण मिरचीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जी-४ नावाने तेथील मिरची ओळखली जाते. काही वर्षांपासून रोगामुळे आणि पारंपरिक पद्धतीने लागवड होत असल्याने मिरचीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे. याला शासनासह कृषी शास्त्रज्ञांनीही गांभीर्याने घेतले असून, मिरचीची आधुनिक पद्धतीने लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांना मिरचीचे नवीन वाण व तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून वाराणसी येथील शासनाची प्रसिद्ध संशोधन संस्था आॅल इंडिया को-आॅर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून गुंटूर आंध्र प्रदेश आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत भिवापुरी मिरचीसोबतच अचलपुरी, जयंती या मिरचीचे आणि गुंटूर येथील जी-४ या मिरचीचे उत्पादन, क्षेत्र वाढविण्याबाबत दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. दोन ते तीन वर्षात त्याचे परिणाम पुढे येतील.वायगाव हळद जगात विख्यातवायगाव हळदबाबत मार्गदर्शन करताना प्रा. घावडे यांनी सांगितले की, वायगाव हळदीने जगात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचे कारण म्हणजे यात असलेल्या ‘कुरकमीन’ हा पदार्थ होय. हळदीचा स्वाद आणि रंग हे कुरकमीन या पदार्थामुळे ठरते. या रंग व स्वादामुळेच त्याला जगात मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड केल्यास कुरकमीन पदार्थाचे प्रमाण वाढू शकते, असे घावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती