शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘भिवापुरी’ मिरचीच्या उत्पादन वाढीसाठी संशोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 10:33 IST

भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.

ठळक मुद्देदोन ते तीन वर्षांत दिसणार परिणाम कृषी विद्यापीठांमध्ये करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भिवापुरी मिरचीला जगात मान्यता आहे. परंतु पारंपरिक लागवड आणि कीड रोगामुळे मिरचीचे उत्पादन व क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. यावर शासन व कृषी शास्त्रज्ञ गंभीर असून भिवापुरी मिरचीसह आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध जी-४ मिरचीचे उत्पादन व क्षेत्र वाढविण्यासंबंधात दोन्ही राज्यातील कृषी विद्यापीठांतर्गत करार करण्यात आला आहे. यादृष्टीने जोमाने काम सुरू असून येत्या दोन-तीन वर्षात याचे परिणाम दिसून येतील.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फलोत्पादन विभागातील सहयोगी प्राध्यापक एस.एम. घावडे यांनी याबाबत माहिती दिली. कृषी जिल्हा महोत्सवांतर्गत मिरची विक्री व व्यवस्थापन यावर ते मार्गदर्शन करीत होते. प्रा. घावडे यांनी सांगितले की, भिवापुरी मिरची ही जगप्रसिद्ध आहे. त्याचप्रकारे आंध्र प्रदेशातील गुंटूर हे क्षेत्र संपूर्ण मिरचीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जी-४ नावाने तेथील मिरची ओळखली जाते. काही वर्षांपासून रोगामुळे आणि पारंपरिक पद्धतीने लागवड होत असल्याने मिरचीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे उत्पादनही कमी होत आहे. याला शासनासह कृषी शास्त्रज्ञांनीही गांभीर्याने घेतले असून, मिरचीची आधुनिक पद्धतीने लागवड व्हावी आणि शेतकऱ्यांना मिरचीचे नवीन वाण व तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे म्हणून वाराणसी येथील शासनाची प्रसिद्ध संशोधन संस्था आॅल इंडिया को-आॅर्डिनेटर रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून गुंटूर आंध्र प्रदेश आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्यात एक करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत भिवापुरी मिरचीसोबतच अचलपुरी, जयंती या मिरचीचे आणि गुंटूर येथील जी-४ या मिरचीचे उत्पादन, क्षेत्र वाढविण्याबाबत दोन्ही विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. दोन ते तीन वर्षात त्याचे परिणाम पुढे येतील.वायगाव हळद जगात विख्यातवायगाव हळदबाबत मार्गदर्शन करताना प्रा. घावडे यांनी सांगितले की, वायगाव हळदीने जगात आपले स्थान पक्के केले आहे. त्याचे कारण म्हणजे यात असलेल्या ‘कुरकमीन’ हा पदार्थ होय. हळदीचा स्वाद आणि रंग हे कुरकमीन या पदार्थामुळे ठरते. या रंग व स्वादामुळेच त्याला जगात मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड केल्यास कुरकमीन पदार्थाचे प्रमाण वाढू शकते, असे घावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agricultureशेती