शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

रिलायन्स कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवा

By admin | Updated: April 8, 2016 03:07 IST

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत.

हायकोर्टात याचिका : खड्ड्यात पडून चिमुकलीचा मृत्यूनागपूर : रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने मोबाईल टॉवर उभारण्यासाठी व केबल टाकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी खड्डे खोदले आहेत. यापैकी एका पाणी भरलेल्या खड्ड्यात पडल्यामुळे पिंकी सोळंकी या दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रिलायन्स कंपनीचे पदाधिकारी व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात यावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.शाहबाज अबरार सिद्धीकी, असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर गृह विभागाचे प्रधान सचिव, नगर विकास विभागाचे सचिव, महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, सीताबर्डी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक ए.बी. नगारे, रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय मश्रुवाला, संचालक मंडळाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, मंडळाचे सदस्य महेंद्र नहाटा, मनोज मोदी, आकाश अंबानी व ईशा अंबानी यांना नोटीस बजावून तीन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.रिलायन्स कंपनी करारातील अटी व शर्तीचा भंग करून केबल टाकण्याचे काम करीत आहे. पूर्वपरवानगीशिवाय काम सुरू केल्यामुळे मनपाने दोनदा कंपनीची बँक हमी जप्त केली आहे. मनपाने कंपनीच्या बँक हमीच्या माध्यमातून २ कोटी १८ लाख ५५ हजार ५५० रुपये प्राप्त केले आहे. पण पिंकीच्या कुटुंबीयांना अद्याप एक रुपया भरपाई देण्यात आली नाही. रोडवरील खड्डे व बांधकाम साहित्यामुळे प्राणघातक अपघात होत आहेत. यासंदर्भात निवेदन सादर करूनही शासनाने काहीच कारवाई केली नाही. रिलायन्स व इतर कंपन्यांच्या केबल टाकण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात यावी, समितीने नियोजन विभागाला आवश्यक कारवाईसाठी अहवाल सादर करावा, केबलच्या कामामुळे पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मनपाने त्वरित कारवाई करावी, पिंकीच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यात यावी, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)