शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नामवंत कंपनीचा नागपुरात आयटी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 06:29 IST

९० एकर जागा मंजूर; संरक्षण उत्पादनासाठी जेएसआर डायनामिक्सला मिहानमध्ये २७ एकर जागा

मुंबई : जगातील एका नामवंत कंपनीचा महत्त्वाकांक्षी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) प्रकल्प लवकरच उभारण्यात येणार असून त्यासाठी ९० एकर जमीन मिहानअंतर्गतच्या एसईझेडमध्ये देण्याचा निर्णय महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

सूत्रांनी सांगितले की, आयटी हब उभारण्यासाठी या कंपनीने मिहानमधील ९० एकर खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. मिहानमध्ये तारांकित हॉटेलांपासून व्यावसायिक वापरासाठी १५.५ एकर जमीन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. त्यासंबंधीच्या प्रस्तावास बुधवारच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या शिवाय, जेएसआर डायनॅमिक्स ही कंपनी संरक्षण सामुग्रीच्या उत्पादनाचा भव्य प्रकल्प मिहानमध्ये उभारणार असून त्यासाठी २७ एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला.पुरंदर, सोलापूर, चंद्रपूर येथील विमानतळांच्या प्रगतीचाही आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला.चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील मूर्ती, विहीरगाव येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार असून त्याच्या कामास गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव राजीव जलोटा, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, सामान्य प्रशासनच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी उपस्थित होते.

अमरावती विमानतळ विस्तारअमरावतीच्या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन १३ जुलै रोजी होणार आहे. सध्याची धावपट्टी १३७४ मीटर असून ती आता १८५० मीटर करण्यात येणार आहे. या कामास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मार्च २०२० पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार असून त्यावर ३६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठी विमाने उतरू शकतील व नाईट लँडिंगही सुरू होईल. टर्मिनल बिल्डिगही उभारण्यात येणार आहे.शिर्डी विमानतळाचा विस्तारशिर्डी विमानतळास मिळत असलेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून नवीन टर्मिनल बिल्डिंग तातडीने उभारण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिले. १ आॅक्टोबर २०१८ पासून आजपर्यंत या विमानतळावरून ५७४४ उड्डाणे झाली आणि ४ लाख १० हजार जणांनी प्रवास केला.