शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

ग्रामीण काँग्रेसचा एकसूर ‘प्रदेश’साठी गटबाजी दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:36 IST

अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे.

ठळक मुद्देवासनिक, गावंडे, चौकसे, भोयर, राऊत, पठाण प्रदेशवर

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे. ग्रामीणमधून १५ नेत्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून प्रदेश काँग्रेसवर पाठविण्यात आले आहे.माजी मंत्री मुकुल वासनिक हे कामठी शहर ब्लॉक मधून तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर हे कामठी ग्रामीणमधून प्रदेशवर गेले आहेत. काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांना काटोलमधून तर आमदार एस.क्यु. जमा यांना उमरेड मधून संधी मिळाली आहे. महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष शांताताई कुमरे यांना रामटेकमधून संधी देण्यात आली आहे तर रामटेक विधानसभेत काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे यांना उमरेड ग्रामीण मधून संधी देण्यात आली आहे. त्यांची प्रदेशवर जाण्याची ही सलग चवथी टर्म आहे.युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांना गेल्यावेळी प्रदेशवर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यावेळी त्यांना हिंगणा ब्लॉकमधून संधी मिळाली आहे. याशिवाय आमदार सुनील केदार (सावनेर), प्रदेश सचिव नाना गावंडे (नागपूर ग्रामीण ), बाबुराव तिडके (मौदा), महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तक्षशिला वाघधरे (नरखेड), मुजीब पठाण (कुही) यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे. ग्रामीण काँग्रेसची ही यादी पाहता भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून सर्वच गटांना संधी देण्यात आल्याचे दिसते. सोबतच एकाच ब्लॉकमध्ये दोन नावे समोर आल्यावर दुसºयाला दुसºया तालुक्यातून सामावून घेण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष आव्हानात्मक परिस्थितीत आहे. त्यामुळे काँग्रेस एकजूट करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आम्ही ग्रामीणमध्ये तेच केले, असे मुळक यांनी सांगितले.ग्रामीणची पक्षशिस्त शहरासाठी आरसामाजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणच्या नेत्यांनी आपसात मतभेद होऊ न देता एकमताने प्रदेश काँग्रेसवर जाण्याचा सर्वांचा मार्ग सुकर केला. ग्रामीण काँग्रेसने दाखविलेली ही पक्षशिस्त नागपूर शहरातील गटबाजी नेत्यांसाठी आरसा आहे. ग्रामीणमध्ये सामोपचाराने निर्णय होऊ शकतो तर शहरात का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.