शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

ग्रामीण काँग्रेसचा एकसूर ‘प्रदेश’साठी गटबाजी दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:36 IST

अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे.

ठळक मुद्देवासनिक, गावंडे, चौकसे, भोयर, राऊत, पठाण प्रदेशवर

कमलेश वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंतर्गत गटबाजीमुळे नागपूर शहर काँग्रेस कमिटीची निवडणूक प्रक्रिया रखडली असताना नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मात्र एकोप्याने आपली गाडी मुंबईपर्यंत पोहचवली आहे. ग्रामीणमधून १५ नेत्यांना प्रदेश प्रतिनिधी म्हणून प्रदेश काँग्रेसवर पाठविण्यात आले आहे.माजी मंत्री मुकुल वासनिक हे कामठी शहर ब्लॉक मधून तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर हे कामठी ग्रामीणमधून प्रदेशवर गेले आहेत. काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष सुनिता गावंडे यांना काटोलमधून तर आमदार एस.क्यु. जमा यांना उमरेड मधून संधी मिळाली आहे. महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्ष शांताताई कुमरे यांना रामटेकमधून संधी देण्यात आली आहे तर रामटेक विधानसभेत काँग्रेस नेते चंद्रपाल चौकसे यांना उमरेड ग्रामीण मधून संधी देण्यात आली आहे. त्यांची प्रदेशवर जाण्याची ही सलग चवथी टर्म आहे.युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत यांना गेल्यावेळी प्रदेशवर प्रतिनिधित्व मिळाले नव्हते. यावेळी त्यांना हिंगणा ब्लॉकमधून संधी मिळाली आहे. याशिवाय आमदार सुनील केदार (सावनेर), प्रदेश सचिव नाना गावंडे (नागपूर ग्रामीण ), बाबुराव तिडके (मौदा), महिला काँग्रेसच्या अध्यक्ष तक्षशिला वाघधरे (नरखेड), मुजीब पठाण (कुही) यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले आहे. ग्रामीण काँग्रेसची ही यादी पाहता भविष्यात वाद होऊ नयेत म्हणून सर्वच गटांना संधी देण्यात आल्याचे दिसते. सोबतच एकाच ब्लॉकमध्ये दोन नावे समोर आल्यावर दुसºयाला दुसºया तालुक्यातून सामावून घेण्यात आले आहे.काँग्रेस पक्ष आव्हानात्मक परिस्थितीत आहे. त्यामुळे काँग्रेस एकजूट करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. आम्ही ग्रामीणमध्ये तेच केले, असे मुळक यांनी सांगितले.ग्रामीणची पक्षशिस्त शहरासाठी आरसामाजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणच्या नेत्यांनी आपसात मतभेद होऊ न देता एकमताने प्रदेश काँग्रेसवर जाण्याचा सर्वांचा मार्ग सुकर केला. ग्रामीण काँग्रेसने दाखविलेली ही पक्षशिस्त नागपूर शहरातील गटबाजी नेत्यांसाठी आरसा आहे. ग्रामीणमध्ये सामोपचाराने निर्णय होऊ शकतो तर शहरात का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.