शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गोसेखुर्द प्रकल्पातील प्रलंबित भूसंपादन प्रकरणे निकाली काढा : सुनील देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:37 IST

गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यक असलेली जमीन कालबद्ध कार्यक्रमानुसार अधिग्रहित करण्याच्या सूचना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी सोमवारी दिल्या.

ठळक मुद्देभूसंपादनासाठी गावस्तरावर मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना थेट सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेली जमीन संपादित करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने ठरवून दिलेल्या दराप्रमाणे तात्काळ खरेदीला सुरुवात करा. तसेच गावपातळीवर महसूल व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यक असलेली जमीन कालबद्ध कार्यक्रमानुसार अधिग्रहित करण्याच्या सूचना विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी सोमवारी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गोसेखुर्द प्रकल्पातील भूसंपादनामुळे प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख व विभागीय आयुक्त अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. गोसेखुर्द प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासंदर्भात जिल्हानिहाय कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी यांनी त्यानुसार भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच दर महिन्याला सर्व यंत्रणांकडून आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त अश्विन मुदगल यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हाधिकारी (भंडारा) शंतनू गोयल, कुणाल खेमनार (चंद्रपूर), विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता अ. रा. कांबळे, अधीक्षक अभियंता जी. एम. शेख, वन जमाबंदी अधिकारी एस. एच. टोणगावकर, उपायुक्त श्रीकांत फडके, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे तसेच जलसंपदा विभागाचे सर्व कार्यकारी अभियंता व महसूल विभागाचे भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही केवळ कालवे व वितरिकांच्या कामांसाठी आवश्यक असलेली जमिन भूसंपादन प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना थेट सिंचनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आवश्यक असलेली जमीन थेट खरेदी करावी. तसेच भूसंपादन अधिनियमानुसार अधिग्रहित करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनील देशमुखGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प