शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

रोडवरील धोकादायक वीज खांब जानेवारीपर्यंत हटवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 23:07 IST

रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला.

ठळक मुद्देयेत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मागितला पहिला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला. तसेच, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत या कारवाईचा पहिला अहवाल सादर करण्यास सांगितले.यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महावितरण कंपनीने या कामासाठी २० कोटी रुपयांचा वाटा अदा केला आहे. न्यायालयाने कंपनीला तसे निर्देश दिले होते. याचिकेतील माहितीनुसार शहरातील २२ रोडवर धोकादायक वीज खांबे व ट्रान्सफार्मर्स आहेत. १७ वर्षापूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स रोडवर आले. असे धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात उदासीनता दाखवली. परिणामी, धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स आजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. तसेच, २००१ मध्ये धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक, अ‍ॅड. गिरीश कुंटे आदींनी कामकाज पाहिले.गरजेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मुभामहावितरणच्या निर्णयानुसार दुरुस्ती कामाकरिता आठवड्यातून एकदा ४ ते ८ तासापर्यंत वीज पुरवठा खंडित करता येतो. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या कामाकरिता हा नियम शिथिल केला. गरजेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याची अधिकाऱ्यांना मुभा दिली व असे करताना नागरिकांची कमीतकमी गैरसोय होईल हे पहावे असेही सांगितले. तसेच, रुग्णालये, शाळा, न्यायालये आदींनी अत्यावश्यक गरजेकरिता केलेली विजेची मागणीदेखील विचारात घ्यावी असे निर्देश दिले.वाहतूक अडथळा ठरू नयेधोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याच्या कामात वाहतूक अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्यावी व यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे न्यायालयाने वाहतूक विभागाला सांगितले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी या कामाला वाहतुकीचा अडथळा होणार नाही अशी ग्वाही दिली. आवश्यक त्या वेळी वाहतूक दुसऱ्या रोडने वळवली जाईल असेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल तेली-उगले व अन्य विभागांचे प्रमुख अधिकारीही न्यायालयात हजर होते.सभागृहात झाली सुनावणीउच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी परिसरातील सभागृहात आयोजित केली होती. सुनावणीसाठी संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्यामुळे वकिलांमध्ये सुनावणीबाबत कुतूहल होते. त्यांनी सभागृहात गर्दी केली होती. आवाज सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी न्यायालयाच्या पटलावर माईक लावण्यात आले होते. स्पीकरमुळे न्यायालयाचे बोलणे सर्वांना स्पष्ट ऐकायला येत होते. हा अनुभव सर्वांकरिता संस्मरणीय ठरला.एसएनडीएलला वगळलेमहावितरण कंपनीने शहरातील वीज वितरण सेवा एसएनडीएल कंपनीकडून स्वत:कडे घेतली आहे. आता शहरातील वीज वितरण सेवेशी एसएनडीएल कंपनीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे एसएनडीएल कंपनीने या प्रकरणातील प्रतिवादींमधून स्वत:ला वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला.सर्वांनी सहकार्य करावेहे काम यशस्वीपणे पूर्ण व्हावे याकरिता सर्व विभागाचे अधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. हे काम जनहिताचे आहे. त्यामुळे याचा विरोध करणे योग्य होणार नाही. धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मस अनेक वर्षापासून अस्तित्वात आहेत. येणाऱ्या पिढीला या धोक्यापासून सुरक्षित करणे आवश्यक आहे. रोडवरील वीज खांब व ट्रान्सफार्ममुळे प्राणघातक अपघात होत आहेत असे मौखिक मत न्यायालयाने व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका