शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रोडवरील धोकादायक वीज खांब जानेवारीपर्यंत हटवा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 23:07 IST

रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला.

ठळक मुद्देयेत्या १५ नोव्हेंबरपर्यंत मागितला पहिला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रोडवरील धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स येत्या ३१ जानेवारीपर्यंत हटविण्यात यावेत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी महापालिका आणि महावितरण कंपनी यांना दिला. तसेच, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत या कारवाईचा पहिला अहवाल सादर करण्यास सांगितले.यासंदर्भात न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. महावितरण कंपनीने या कामासाठी २० कोटी रुपयांचा वाटा अदा केला आहे. न्यायालयाने कंपनीला तसे निर्देश दिले होते. याचिकेतील माहितीनुसार शहरातील २२ रोडवर धोकादायक वीज खांबे व ट्रान्सफार्मर्स आहेत. १७ वर्षापूर्वी एकात्मिक रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत शहरातील रोड रुंद करण्यात आले. त्यामुळे विजेचे खांब व ट्रान्सफार्मर्स रोडवर आले. असे धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स तात्काळ हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिकेने यासंदर्भात उदासीनता दाखवली. परिणामी, धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स आजही यमदूत बनून रोडवर उभे आहेत. याविषयी यापूर्वी दाखल करण्यात आलेली रिट याचिका उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर २००५ रोजी निकाली काढताना रोडवरील धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स हटविण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. तसेच, २००१ मध्ये धोकादायक वीजखांबे व ट्रान्सफार्मर्स हटविण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला. परिणामी परिस्थिती जैसे थे आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र असून इतर पक्षकारांतर्फे अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, अ‍ॅड. सुधीर पुराणिक, अ‍ॅड. गिरीश कुंटे आदींनी कामकाज पाहिले.गरजेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मुभामहावितरणच्या निर्णयानुसार दुरुस्ती कामाकरिता आठवड्यातून एकदा ४ ते ८ तासापर्यंत वीज पुरवठा खंडित करता येतो. नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या कामाकरिता हा नियम शिथिल केला. गरजेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याची अधिकाऱ्यांना मुभा दिली व असे करताना नागरिकांची कमीतकमी गैरसोय होईल हे पहावे असेही सांगितले. तसेच, रुग्णालये, शाळा, न्यायालये आदींनी अत्यावश्यक गरजेकरिता केलेली विजेची मागणीदेखील विचारात घ्यावी असे निर्देश दिले.वाहतूक अडथळा ठरू नयेधोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मर्स हटविण्याच्या कामात वाहतूक अडथळा ठरणार नाही याची काळजी घ्यावी व यासंदर्भात वेळोवेळी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे न्यायालयाने वाहतूक विभागाला सांगितले. यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी या कामाला वाहतुकीचा अडथळा होणार नाही अशी ग्वाही दिली. आवश्यक त्या वेळी वाहतूक दुसऱ्या रोडने वळवली जाईल असेही त्यांनी सांगितले. मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल तेली-उगले व अन्य विभागांचे प्रमुख अधिकारीही न्यायालयात हजर होते.सभागृहात झाली सुनावणीउच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी परिसरातील सभागृहात आयोजित केली होती. सुनावणीसाठी संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्यामुळे वकिलांमध्ये सुनावणीबाबत कुतूहल होते. त्यांनी सभागृहात गर्दी केली होती. आवाज सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी न्यायालयाच्या पटलावर माईक लावण्यात आले होते. स्पीकरमुळे न्यायालयाचे बोलणे सर्वांना स्पष्ट ऐकायला येत होते. हा अनुभव सर्वांकरिता संस्मरणीय ठरला.एसएनडीएलला वगळलेमहावितरण कंपनीने शहरातील वीज वितरण सेवा एसएनडीएल कंपनीकडून स्वत:कडे घेतली आहे. आता शहरातील वीज वितरण सेवेशी एसएनडीएल कंपनीचा काहीच संबंध नाही. त्यामुळे एसएनडीएल कंपनीने या प्रकरणातील प्रतिवादींमधून स्वत:ला वगळण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला.सर्वांनी सहकार्य करावेहे काम यशस्वीपणे पूर्ण व्हावे याकरिता सर्व विभागाचे अधिकाऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करावे. हे काम जनहिताचे आहे. त्यामुळे याचा विरोध करणे योग्य होणार नाही. धोकादायक वीज खांब व ट्रान्सफार्मस अनेक वर्षापासून अस्तित्वात आहेत. येणाऱ्या पिढीला या धोक्यापासून सुरक्षित करणे आवश्यक आहे. रोडवरील वीज खांब व ट्रान्सफार्ममुळे प्राणघातक अपघात होत आहेत असे मौखिक मत न्यायालयाने व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmahavitaranमहावितरणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका