शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

समाजातून जातीभेद दूर करा, जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय ?

By योगेश पांडे | Updated: December 19, 2023 10:57 IST

हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली.

योगेश पांडे

नागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. पुढील वर्षी देश व राज्यात नाहीत निवडणूक असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यावरच भर राहिला. संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा आणि समाजातील जातीभेद दूर करा, असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता काय असा सवाल संघातर्फे उपस्थित करण्यात आला.

सकाळच्या सुमारास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होता. यावेळी सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली. संघातर्फे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, कार्यवाह अतुल मोघे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते.

जातीव्यवस्था कालबाह्य आहे. जर जनगणनेमुळे विषमता व तेढ वाढत असेल तर त्याची गरज नाही. समाजात सामाजिक समरसता वाढली पाहिजे यावरच भर द्यायला हवा असे श्रीधर गाडगे यांनी स्पष्ट केले.

यावेळी संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्ह्याजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे. नागरी कर्तव्य, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी या सुत्रांसाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे, असेदेखील यावेळी श्रीधर गाडगे यांनी सांगितले.भाजप आमदारांना मंथन या पुस्तकाच्या प्रती देण्यात आल्या.

- काही आमदारांची दांडी

रेशीमबागेत सर्व भाजप आमदारांना उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती.मात्र विधानसभा व विधान परिषदेतील काही आमदार  अनुपस्थित होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील पोहोचू शकले नाही.

- मंत्र्यांचा ‘दक्ष’ पवित्रा

एरवी मंत्री तसेच नितेश राणे यांच्यासारखे सदस्य प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

- शिवसेनेचे आमदार उपस्थित

यावेळी शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) देखील उपस्थित होते. त्यात मंत्री दीपक केसरकर, मनीषा कायंदे, भरत गोगावले, आशिष जैस्वाल यांचा समावेश होता.