शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

७० वर ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:32 IST

जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज करण्याचे पडताळणी समितीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करून अकोला जिल्ह्यातील ७० वर ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : जात वैधता प्रमाणपत्राचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जात वैधता प्रमाणपत्राचे दावे खारीज करण्याचे पडताळणी समितीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द करून अकोला जिल्ह्यातील ७० वर ग्राम पंचायत सदस्यांना दिलासा दिला.वादग्रस्त आदेशाविरुद्ध पीडित सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्ते विविध ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत राखीव जागांवरून विजयी झाले आहेत. कायद्यानुसार, त्यांना निवडणूक अधिकाऱ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावे सादर केले होते. व्हिजिलन्स सेलने प्रत्येकाची चौकशी करून समितीला अहवाल सादर केले. त्यानंतर समितीने त्या अहवालांची प्रत याचिकाकर्त्यांना न देता सर्वांचे दावे खारीज केले. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. व्हिजिलन्स सेलच्या अहवालावर सुनावणीची संधी देणे आवश्यक होते. परंतु, समितीने नैसर्गिक न्यायतत्त्वाचे पालन केले नाही. त्यामुळे समितीचे आदेश रद्द करण्यात यावे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता याचिकाकर्त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून समितीचे वादग्रस्त आदेश रद्द केले व याचिकाकर्त्यांच्या दाव्यावर कायद्यानुसार सहा महिन्यांत नव्याने निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. उज्ज्वल देशपांडे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र