शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा; वीज सबसिडी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 21:02 IST

Nagpur News राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात राज्य सरकारने विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देताना वीज बिलात पुन्हा सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारचा अध्यादेश१२०० कोटी रुपये देण्याचा निर्णय

नागपूर : राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात राज्य सरकारने विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देताना वीज बिलात पुन्हा सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काढलेल्या अध्यादेशात उद्योगांना दरवर्षी १,२०० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील ‘डी’ आणि ‘डी प्लस’ क्षेत्रातील उद्योगांना होणार आहे.

आधी सहा महिने सबसिडी बंद

वर्ष २०१६मध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने वीज बिलावर सबसिडी देण्याची घोषणा केली होती. त्याकरिता वार्षिक १,२०० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, २०२१च्या सप्टेंबर महिन्यापासून सबसिडी देणे बंद झाले. वर्ष २०२२मध्ये केवळ एप्रिल महिन्यात सबसिडी देण्यात आली. राज्य सरकारच्या निर्णयामुळे उद्योगांमध्ये रोष होता. दुसरीकडे राज्य सरकारने नियमात संशोधन करण्यासाठी समिती स्थापन केली होती. काही उद्योग जास्त प्रमाणात सबसिडी घेत असल्याचे सरकारचे मत होते.

वार्षिक २० कोटींची मर्यादा

आता सरकारने काढलेल्या अध्यादेशात नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वार्षिक २० कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. त्यापेक्षा जास्त सबसिडी कोणताही उद्योग घेऊ शकणार नाही, असे त्यात स्पष्ट केले आहे. १ एप्रिल २०२२पासून नवीन सबसिडी लागू होणार आहे. आता स्थिर सवलत, कार्यक्षमता आधार आणि विजेच्या घटकांवर सबसिडी देण्यात येणार आहे. नवीन उद्योगांना फायदा घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र किंवा उद्योग संचालनालयाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे.

‘एचटी’ उद्योगांना कमी फायदा

राज्य सरकारच्या आदेशामुळे एलटी अर्थात लघुदाब उद्योगांना फायदा होईल. पण, एचटी अर्थात उच्च व अतिउच्चदाबाच्या उद्योगांना आधीपेक्षा कमी सबसिडी मिळेल. लोड घटकाचा आधार घेतल्यामुळे बहुतांश उद्योगांचे नुकसान होईल. यात केवळ १० टक्केच उद्योग येतात. सबसिडीची मर्यादा २० कोटी केल्याचा चांगला निर्णय आहे, पण व्हीआयए या निर्णयाचा विरोध करेल.

आर. बी. गोयनका, ऊर्जा विशेषतज्ज्ञ व उपाध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए).

सरकारकडे पैसे कुठून येणार?

सरकारने उद्योगांना १,२०० कोटी रुपये सबसिडी देण्याची घोषणा तर केली पण हा पैसा कुठून येणार, हा गंभीर प्रश्न आहे. घोषणेत केवळ तरतूद असते. पण, प्रत्यक्षात पैशांचे वितरण होत नाही. पैसा मिळाला नाही तर महावितरण सबसिडी कशी देणार? हासुद्धा प्रश्न आहे.

सुधीर मुनगंटीवार, माजी वित्तमंत्री, राज्य सरकार.

टॅग्स :MIDCएमआयडीसी