शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वीज बिलाचा दिलासा दोन हजार कोटीसाठी अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 22:36 IST

लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीज बिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य सरकारची घोषणा कधी पूर्ण होणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीजबिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. दिलासा देण्यासाठी वीज कंपन्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तिजोरी उघडली तरच सामान्य नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळेल, हे स्पष्ट आहे. तेव्हा सध्यातरी वीज बिलाचा दिलासा हा दोन हजार कोटी रुपयांसाठी अडकून आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जामंत्री व वीज अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अशी घोषणा केली होती की, राज्य सरकार लॉकडाऊन काळात एकाचवेळी आलेल्या वीज बिलापासून नागरिकांना दिलासा देण्यावर विचार करीत आहे. ऊर्जामंत्री राऊत यांनीही सरकार नागरिकांच्या मदतीसाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार होता. परंतु पाच आठवड्यानंतरही राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकलेले नाही.सूत्रानुसार घोडे निधीसाठी अडकले आहे. वीज कंपन्यांनी जो प्रस्ताव पाठवला आहे त्यानुसार १८०० ते २००० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या निधीमुळे राज्य सरकार दुविधेत आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, यासंदर्भात सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे. सरकारने निधी दिला तरच वीज बिलांमध्ये दिलासा दिला जाऊ शकतो. ऊर्जा मंत्रालयातील सूत्रानुसार मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही दिलासा देण्याची घोषणा नाकारण्यात आलेली नाही.१०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकतेराज्य सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली. तो दिलासा नेमका काय असेल याबाबत असे सांगितले जाते की, यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकते. १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. दुसºया एका प्रस्तावात १०० युनिटपर्यंतचे वीज बील माफ करणे आणि एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.असा मिळणार होता दिलासाराज्य सरकारने वीज बिलात दिलासा देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात काही शिफारस करण्यात आली होती. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट. तसेच एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु आता हा प्रस्तावच थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल