शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुनर्वसन झाले पण सात वर्षापासून रस्ता नाही; नारी-उप्पलवाडी वसाहतीमधील रहिवासी त्रस्त

By गणेश हुड | Updated: May 27, 2023 16:55 IST

नारी व उप्पलवाडी या वसाहतीत शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे.

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत उत्तर नागपूर मतदार संघातील नारीच्या मागील भागात शहरापासून दूर आडवळणाच्या जागेवर नारी ( खसरा क्र. १०९-११०/२,३)येथे बहुमजली पुनर्वसन वसाहत ७ वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून येथे ५४४ गाळे आहेत. तर उप्पलवाडी-नारी येथे ८ वर्षांपूर्वी २३४ गाळे बांधण्यात आले. या वसाहतींना मुख्य रस्त्यांशी जोडणारा रस्ता नसल्याने येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नारी व उप्पलवाडी या वसाहतीत शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. येथे शहरात मोलमजुरी व इतर व्यवसाय करून गुजराण करणारी गरीब- श्रमिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. परंतु, या वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ताच नसल्यामुळे या नागरिकांना शहरात जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता बनविण्याची मागणी शहर विकास मंचच्या वतीने मागील ४ वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने करूनही रस्त्याची निर्मिती झालेली नाही.शहाराचा चौफेर विकास होत असताना दोन वसाहती मात्र विकासापासून अजूनही दूर आहेत.

शहराशी जोडणारा रस्ता तयार करा

उत्तर नागपुरातील नारी भागात उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसन वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता तातडीने बनविण्याची मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णण बी. व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केली. या शिष्टमंडळात राजकुमार वंजारी, रामदास उईके, डाॅ. दिलीप तांबटकर, रंजना भगत, शैलेंद्र वासनिक, उत्तर नागपूर विकास आघाडीचे मुख्य संघटक आमप्रकाश मोटघरे आदींचा समावेश होता.

टॅग्स :nagpurनागपूर