शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीज दरवाढीच्या प्रस्तावावर नियामक आयोगाची आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 00:20 IST

महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगातर्फे राज्यात ठिकठिकाणी सुनावणी घेतली जात आहे.

ठळक मुद्देमहावितरणची वीज दरवाढीची याचिका : विविध संघटना आक्षेप व सूचना नोंदवणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढीच्या याचिकेवर राज्य वीज नियामक आयोगातर्फे राज्यात ठिकठिकाणी सुनावणी घेतली जात आहे. उद्या ११ फेब्रुवारी रोजी नागपुरात वनामती येथे सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होईल. दिवसभर चालणाऱ्या या सुनावणीत वीज नियामक आयोग विविध वीज संघटना व ग्राहक संघटनांची बाजू ऐकून घेतील. यावेळी विविध संघटना आपले आक्षेप नोंदवणार आहेत.महावितरणने आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या कालावधीसाठी आयोगासमोर गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी वीजदर याचिका दाखल केली आहे. या याचिकेत महावितरणला ६०,३१३ कोटी रुपये महसूल तूट झाल्याचे सांगत, ते भरून काढण्यासाठी वीजदरात वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महसुली तूट कमी करण्यासाठी महावितरणने विविध वर्गवारीतील ग्राहकांच्या स्थिर आकारात व वीज आकारात सुधारणा प्रस्तावित केली आहे. महावितरणच्या या दरवाढ याचिकेवरील सुनावणीत व्हीआयए, क्रेडाई नागपूर मेट्रो आदींसह विविध वीज ग्राहक संघटना आयोगासमोर आपापली बाजू मांडतील व आक्षेप व सूचना नोंदवतील.यासंदर्भात वीज क्षेत्रातील जाणकार महेंद्र जिचकार हे सुद्धा आपले आक्षेप व सूचना नोंदवणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, महावितरणने दोन वर्षात चारवेळा दरवाढ केली आहे. ही पाचवी दरवाढ आहे. ० ते १०० युनिट वापर महाग झाला आहे. पाच वर्षातील ही दरवाढ ५० टक्क्याहून अधिक आहे. या प्रस्तावामुळे जास्त वापर असलेल्या व्यावसायिक ग्राहकांना फायदा होईल. तर किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, डेली नीड्स दुकाने इत्यादींसारख्या छोट्या आस्थापनांकडून अधिक शुल्क आकारले जाईल. लहान आस्थापनांवर हा अन्याय आहे. शेजारील छत्तीसगडमध्ये सर्वात कमी वीजदर आहे तर महाराष्ट्रात सर्वाधिक दर आहे. वाढीव वीजदर राज्याच्या विकासाला अडथळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही १०० युनिटपर्यंत वीज मोफत करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर या सुनावणीत नेमके काय घडते, हे उद्याच दिसून येईल.राज्यात वीज सर्वात महागशेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज सर्वात महाग असल्याने त्याचा उघड विरोध होत आहे. विशेष म्हणजे ५० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना महाराष्ट्रात २१७ रुपये बिल भरावे लागते. तेच तेलंगणा राज्यात ७३ रुपये भरावे लागते. मध्य प्रदेशात इतक्याच युनिटसाठी २०३ रुपये लागतात. तर आंध्र प्रदेशात ७३ रुपये आणि सर्वात कमी छत्तीसगडमध्ये ५० युनिटसाठी केवळ ५० रुपये बिल भरावे लागत आहे.महाराष्ट्रात १०० युनिटपर्यंत घरगुती वीज ग्राहकांना ४३३ रुपये बिल भरावे लागत आहे. तेलंगणा राज्यात २०३ रुपये, गोव्यामध्ये १४० रुपये, छत्तीसगडमध्ये १०० रुपये बिल भरावे लागत आहे. त्याचप्रकारे २०० युनिटच्या वापरासाठी महाराष्ट्रात १२५६ रुपये बिल येत आहे. छत्तीसगडमध्ये २१० रुपये, तेलंगणामध्ये ७६० रुपये, गुजरातमध्ये ७४३ रुपये आणि गोव्यामध्ये ३५० रुपये वीज बिल भरावे लागत आहे. ३०० युनिटसाठीही असेच अंतर आहे. राज्यात २०७९ रुपये बिल भरावे लागते. तर छत्तीसगडमध्ये ३८० रुपये, गोव्यामध्ये ६१५ रुपये वीज बिल भरावे लागत आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल