शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

‘रिफायनरी’मुळे विदर्भाचा आर्थिक विकास होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोकणातून विरोध होत असल्याने नाणार ‘पेट्रोकेमिकल रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी समोर येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोकणातून विरोध होत असल्याने नाणार ‘पेट्रोकेमिकल रिफायनरी’ प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी समोर येत आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाचा आर्थिक विकास तर होईलच. शिवाय येथे नवीन प्रक्रिया उद्योगदेखील येतील व पर्यायाने रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. भौगोलिक स्थान, पायाभूत सुविधा, ‘कनेक्टिव्हिटी’, जमिनीची कमी किंमत, ‘लॉजिस्टिक्स’ या जमेच्या बाजू लक्षात घेता या ‘रिफायनरी’साठी विदर्भ हेच योग्य स्थान आहे, असा दावा काही तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

विदर्भातील अनेक बलस्थानांकडे राज्य शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. सध्याच्या औद्योगिक स्थितीत ‘रिफायनरी’ व ‘पेट्रोकेमिकल्स’चे महत्त्व वाढलेले आहे. केवळ वेगवेगळ्या प्रकारचे इंधनच नव्हे तर उद्योगांसाठी आवश्यक असलेले घटकदेखील त्यातून मिळतात. गुजरातमध्ये ४५ टक्के रिफायनिंग व ८० टक्के पेट्रोकेमिकल्सचे उत्पादन होते व तेथे टेक्सटाईल, सिरॅमिक्स, फार्मसी, एफएमसीजी आणि खतांच्या उद्योगात प्रचंड गुंतवणूक येत आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ‘रिफायनरी’तील उत्पादनांचाच उपयोग केला जात आहे. विदर्भात ‘रिफायनरी’ आल्यावर ‘इंडस्ट्रीअल प्लास्टिक’, ‘लुब्रिकन्ट्स’, टायर्सचे नवीन प्रकल्प येतील. याशिवाय आपल्याकडे जमीन-पाणी व विजेची उपलब्धता, सुशिक्षित तरुणांचे मनुष्यबळ या बाब लक्षात घेता ‘रिफायनरी’ स्थापन करण्यासाठी विदर्भ हे उत्तम स्थान आहे, असे मत या विषयातील तज्ज्ञ प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

प्रक्रिया उद्योगांत वाढ होईल

‘रिफायनरी’मुळे सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग येतील व तेथे कृषी उत्पादनांचा कच्चा माल म्हणून उपयोग होईल. यातून कच्च्या मालाची मागणी वाढेल व त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. विदर्भात कापसाचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे विविध प्रकारचे ‘टेक्सटाईल’ बनविण्यास वाव राहील. सोबतच विविध प्रक्रिया उद्योगदेखील उभे राहतील.

शेतकऱ्यांसाठी नवीन पिकांचा पर्याय

‘रिफायनरी’मुळे विदर्भात ‘लुब्रिकन्ट्स युनिट’ येतील व त्यासाठी एरंडेल तेलाची मागणी वाढेल. येतील शेतकरी त्याचे उत्पादन घेऊ शकतील. शिवाय ‘रिफायनरी’मुळे ‘इथेनॉल’ची विक्री आणखी वाढेल. कन्हान, पैनगंगा व वैनगंगा या नद्यांच्या जवळपास शेतकरी ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात व त्यामुळे उद्योजकता वाढेल.

कापसाची मागणी वाढेल

‘रिफायनरी’ व कापूस प्रक्रिया उद्योग यशस्वी होऊ शकतो हे गुजरातने दाखवून दिले आहे. सुरतप्रमाणे विदर्भातदेखील विविध प्रकारचे सूत बनविण्यासाठी ‘टेक्सटाईल युनिट्स’ सुरू होतील. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील व विदर्भाची अर्थव्यवस्था प्रगती करेल.

रोजगारनिर्मिती होईल

‘रिफायनरी’चा मोठा प्रकल्प आल्यानंतर तेथे काम करणाऱ्या मनुष्यबळाची वाढ होईल. त्यामुळे मेट्रो, उड्डाणपूल वापरणाऱ्यांची संख्या वाढेल. त्यादृष्टीने पायाभूत सुविधांचा आणखी विकास करण्यास संधी निर्माण होईल. या क्षेत्रात ३ लाख थेट रोजगारांची निर्मिती होऊ शकेल.