शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि ...

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि धान्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका गरीब आणि सामान्यांना बसत आहे. केंद्र सरकारने अनावश्यक करांची कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची व्यापारी आणि नागरिकांची मागणी आहे. वर्षभरात पेट्रोल २३ रुपये, तर डिझेल २४ रुपयांनी वाढले आहे, हे विशेष.

गेल्यावर्षी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे उद्योग आणि मालवाहतूक बंद होती. यावर्षीही दीड महिन्यापासून डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे ७० टक्के मालवाहतूक बंद आहे. डिझेलचे दर ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणात मालवाहतुकीचेही दर वाढले नाहीत. त्यामुळे अनेक ट्रक जागीच उभे आहेत. त्याचा फटका ट्रान्सपोर्टर्सला बसला आहे. त्यांचे बँकांचे कर्ज, व्याज, ड्रायव्हर व क्लिनरचा पगार सुरूच आहे. अनेकांनी सहा महिन्यांपासून ट्रकचे बँकांचे हप्ते फेडले नाहीत. अशांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. कोरोना आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रान्सपोर्टर्स संकटात आले आहेत.

नागपूर ट्रकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष कुक्कु मारवाह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीने नागपुरात जवळपास १० ते १२ हजार ट्रक जागेवर उभे आहेत. उत्पन्न नसल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. काम मिळत नसल्याने अनेकांनी ट्रक विक्रीला काढले आहे. वर्षभरात डिझेलचे दर २४ रुपये लिटर वाढले, पण मालवाहतुकीचे दर ‘जैसे थे’ आहेत. सध्या हा व्यवसाय जोखमीचा झाला आहे. ट्रक उभा राहण्याऐवजी ट्रान्सपोर्टर तोट्यातच मालवाहतूक करीत आहेत. अशी स्थिती आणखी काही महिने राहिल्यास अनेक ट्रान्सपोर्टर्सपुढे घरदार विकल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे किराणा वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांना किराणा वस्तू महागात खरेदी कराव्या लागत आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडतील.

नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची ओरड सुरू आहे. दरवाढीच खापर ग्राहक किरकोळ दुकानदारांवर फोडतात, हे चुकीचे आहे. मालवाहतुकीचे दर कमी झाल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर काही प्रमाणात कमी होतील.