शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि ...

नागपूर : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीचा वाहनचालकांना त्रास होत असून, मालवाहतुकीचे दर वाढत आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू आणि धान्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका गरीब आणि सामान्यांना बसत आहे. केंद्र सरकारने अनावश्यक करांची कपात करून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची व्यापारी आणि नागरिकांची मागणी आहे. वर्षभरात पेट्रोल २३ रुपये, तर डिझेल २४ रुपयांनी वाढले आहे, हे विशेष.

गेल्यावर्षी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे उद्योग आणि मालवाहतूक बंद होती. यावर्षीही दीड महिन्यापासून डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मालवाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमुळे ७० टक्के मालवाहतूक बंद आहे. डिझेलचे दर ज्या प्रमाणात वाढले त्या प्रमाणात मालवाहतुकीचेही दर वाढले नाहीत. त्यामुळे अनेक ट्रक जागीच उभे आहेत. त्याचा फटका ट्रान्सपोर्टर्सला बसला आहे. त्यांचे बँकांचे कर्ज, व्याज, ड्रायव्हर व क्लिनरचा पगार सुरूच आहे. अनेकांनी सहा महिन्यांपासून ट्रकचे बँकांचे हप्ते फेडले नाहीत. अशांना बँकांच्या नोटिसा येत आहेत. कोरोना आणि डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रान्सपोर्टर्स संकटात आले आहेत.

नागपूर ट्रकर्स युनिटी असोसिएशनचे अध्यक्ष कुक्कु मारवाह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीने नागपुरात जवळपास १० ते १२ हजार ट्रक जागेवर उभे आहेत. उत्पन्न नसल्याने बँकांचे हप्ते थकले आहेत. काम मिळत नसल्याने अनेकांनी ट्रक विक्रीला काढले आहे. वर्षभरात डिझेलचे दर २४ रुपये लिटर वाढले, पण मालवाहतुकीचे दर ‘जैसे थे’ आहेत. सध्या हा व्यवसाय जोखमीचा झाला आहे. ट्रक उभा राहण्याऐवजी ट्रान्सपोर्टर तोट्यातच मालवाहतूक करीत आहेत. अशी स्थिती आणखी काही महिने राहिल्यास अनेक ट्रान्सपोर्टर्सपुढे घरदार विकल्याशिवाय पर्याय उरणार नाही.

नागपूर इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, डिझेलच्या वाढत्या किमतीसोबतच मालवाहतुकीचे दर वाढले आहेत. त्यामुळे किराणा वस्तूंच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब व सामान्यांना किराणा वस्तू महागात खरेदी कराव्या लागत आहे. इंधनाचे दर असेच वाढत राहिल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडतील.

नागपूर चिल्लर किराणा असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, डिझेलच्या दरवाढीमुळे जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची ओरड सुरू आहे. दरवाढीच खापर ग्राहक किरकोळ दुकानदारांवर फोडतात, हे चुकीचे आहे. मालवाहतुकीचे दर कमी झाल्यास जीवनावश्यक वस्तूंचे दर काही प्रमाणात कमी होतील.