शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तोटा कमी करण्यासाठी बस सीएनजीवर चालवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:43 IST

नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांचे निर्देश : शहर बसचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिका शहर बस सेवा चालवित आहेत. शहर बस तोट्यात आहे म्हणून काही मार्गावरील बस बंद करणे योग्य नाही. तोटा कमी करण्यासाठी रेड बस सीएनजीवर चालवा, असे निर्देश कें द्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी आयोजित शहर बस आढावा बैठकीत दिलेत.वर्ष २००७ पूर्वी शहर बससेवा ही राज्य सरकारमार्फत संचालित केली जात होती. त्यानंतर, महापालिकांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. महापालिकेने वंश निमय कंपनीकडे शहर बस सेवा सोपविली़ मात्र ही कंपनी बससेवा चालविण्यात अपयशी ठरली़ परिणामी वंश सोबतचा करार रद्द करण्यात आला़ गतवर्षी मनपाने तीन नवीन आॅपरेटर नेमून त्यांच्याकडे शहर बस सेवा सोपविली़ शहरातील स्टार बस (रेड बस) या तिन्ही आॅपरेटरला विभागून देण्यात आल्या़ तर ग्रीन बस स्कॅनिया कंपनी चालवित आहे़ त्यानंतरही तोटा वाढत असल्यामुळे काही मार्गावरील बसेस बंद करण्यात आल्या़ तसेच तिकिटाचे दर वाढविण्याचाही प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी बैठक घेतली़ नागरिकांना चांगली सेवा देणे हे महापालिकेचे कर्तव्य असल्याने ग़्रीन बस सेवा देखील बंद करू नये, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप तसेच शहर बससेवा सांभाळणारे सर्व आॅपरेटर उपस्थित होते़बस भाडे वाढणारडिझेलचे दर वाढत असल्याने शहर बसच्या तोट्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात १८ ते २० टक्के प्रस्तावित आहे. बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या मागील सर्वसाधारण सभेपासून भाडेवाढीचा प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाला गडकरी यांच्याकडून सहमती घेतली जाणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका