शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अभियंत्यापासून हप्ता वसुली

By admin | Updated: July 4, 2014 01:14 IST

बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर

५० हजार घेतले : बदनामीची भीती दाखवून घेतले पैसेनागपूर : बदनामी करण्याची धमकी देऊन सिंचन विभागातील अभियंत्यापासून ५० हजार रुपये हप्ता वसूल करण्यात आला. ही घटना मानेवाडा चौकात घडली. बदनामीच्या भीतीने अभियंत्याने दोन दिवसानंतर या विरोधात तक्रार दाखल केली. मानेवाडा मार्गावरील रहिवासी राम दशपुत्रे सिंचन विभागात अभियंता आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना २९ जूनच्या रात्री १० वाजता एका व्यक्तीने दूरध्वनीवरून त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीचा मानेवाडा चौकात अपघात झाल्याची माहिती दिली. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने त्यांना तातडीने मानेवाडा चौकात पोहोचण्यास सांगितले. त्या व्यक्तीवर विश्वास ठेवून दशपुत्रे मानेवाडा चौकात पोहोचले. मानेवाडा चौकात दशपुत्रे यांना तीन पुरुष आणि एक महिला दिसली.पुरुषांनी त्यांना धमकावून संबंधित महिलेशी संबंध ठेवण्याचा आरोप लावला. परंतु दशपुत्रे महिला आणि पुरुष यांना ओळखतच नव्हते. त्यांनी महिलेला ओळखण्यास नकार देऊन तिच्याशी कुठलेच संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर या महिलेसोबत असलेल्या पुरुषांनी त्यांची पोलिसात चांगली ओळख असल्याची बतावणी करून तक्रार देण्याची धमकी दिली. तक्रार दिल्यानंतर तुमची बदनामी होईल, अशी भीतीही त्यांना दाखविण्यात आली. तक्रार टाळायची असल्यास ५० हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या धमकीमुळे दशपुत्रे घाबरले. त्यांनी पत्नीला फोन करून महत्त्वाच्या कामासाठी ५० हजार रुपयांची व्यवस्था करण्यास सांगितले. त्यांच्या पत्नीकडे कमी रक्कम असल्यामुळे त्यांनी मित्रांकडून पैसे उसने घेतले. आरोपींनी दशपुत्रे यांच्या घरी जाऊन पैसे घेतले. घटनेची माहिती कुणालाही दिल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. परंतु ही माहिती दशपुत्रे यांनी पत्नीला सांगितली. बदनामीच्या भीतीने दशपुत्रे यांनी याविरोधात पोलिसात तक्रार दिली नाही. मित्रांनी दबाव टाकल्यामुळे त्यांनी बुधवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)आठवड्यातील तिसरी घटनादशपुत्रे यांच्यासोबत घडलेली घटना ही आठवड्यातील तीसरी घटना आहे. मागील आठवड्यात फ्रेंड्स कॉलनीत विमा एजंट होऊन एका तरुणाला लुटले होते. कोराडीतही एका वेश्येसोबत गेलेल्या एका तरुण व्यापाऱ्याचा मोबाईल आणि ३० हजार रुपये लुटण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना नेहमीच होत असून बदनामीच्या भीतीने या घटना पुढे येत नाहीत. या घटनांमुळे शहरात संघटित गुन्हेगारी सक्रिय होत आहे.