शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान होते, असे सांगून येणाऱ्या काळात वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत नरकेसरी प्रकाशनचे

विलास डांगरे : ग्रंथालय भारतीचा पुरस्कार वितरण सोहळानागपूर : स्वामी विवेकानंद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात ग्रंथांना महत्त्वाचे स्थान होते, असे सांगून येणाऱ्या काळात वाचन संस्कृती पुनर्जीवित करणे आवश्यक असल्याचे मत नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांनी व्यक्त केले.ग्रंथालय भारतीतर्फे आज, रविवारी लक्ष्मीनगरातील सुयोग मंगल कार्यालयात डॉ. श्री. गो. काशीकर स्मृती समाज प्रबोधनपर साहित्य पुरस्कार व मंगला गोविंद पांडे स्मृती उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार वितरण आणि ‘ग्रंथ भारती’ या त्रैमासिकाच्या प्रथम अंकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. आमदार अनिल सोले प्रमुख अतिथी होते.व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष बाबा देशपांडे, सचिव डॉ. माधव पात्रीकर, कार्याध्यक्ष डॉ. सुधीर बोधनकर, प्रायोजक रवींद्र पांडे व मोहन काशीकर उपस्थित होते.तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे केवळ वाचनाची आवड कमी झाली आहे, वाचन संस्कृती पूर्णपणे संपलेली नाही. विशेषत: तरुण वर्ग वाचनापासून दुरावला आहे. पूर्वी शालेय जीवनापासूनच वाचनाचे संस्कार होत होते. पुस्तके वाचून अभ्यासाची टिपणे काढावी लागत होती. आता संगणकावर हवे ते प्राप्त होते. जुने ते टाकावू असे न समजता चांगल्या सवयी कायम टिकविल्या पाहिजे. विकासासोबत मूल्यांचेही जतन करणे आवश्यक आहे, असे डांगरे यांनी पुढे सांगितले.सोले म्हणाले, वाचन संस्कृती टिकविण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून नागपुरात राष्ट्रीय ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. पूर्वीच्या तुलनेत वाचन कमी झाले आहे. मुलांमध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची आवड निर्माण केली पाहिजे.डांगरे व सोले यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण व त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले.ग्रंथ परीक्षण समितीमधील डॉ. प्रज्ञा आपटे, डॉ. भास्कर भांदककर, डॉ. लिना निकम, डॉ. शुभा साठे, डॉ. आर. एन. देशपांडे, डॉ. डी. आर. देशपांडे व डॉ. सविता भालेराव यांच्यासह प्रायोजकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.पुरस्काराचे मानकरी डॉ. श्री. गो. काशीकर स्मृती समाज प्रबोधनपर साहित्य पुरस्कारप्रथम : वसुधा परांजपे, पुणे (पुस्तक - समईच्या शुभ्रकळ्या, प्रकाशक - स्नेहल प्रकाशन पुणे)द्वितीय : प्रा. अरविंद खांडेकर, नागपूर (पुस्तक - अमृताचा वसा, प्रकाशक - ऋचा प्रकाशन)तृतीय : डॉ. संगीता टक्कामोरे, रामटेक (पुस्तक - विदर्भातील आर्थिक आणि सामाजिक विचार, प्रकाशक - मंगेश प्रकाशन), डॉ. किशोर महाबळ, नागपूर (पुस्तक - बुधवारची शाळा, प्रकाशक - विसा बुक्स)मंगला गोविंद पांडे स्मृती उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कारप्रथम : बबन आखरे, दस्तुर रतनजी ग्रंथालय, खामगाव, जि. बुलडाणाद्वितीय : सुरेश पट्टलवार, सार्वजनिक वाचनालय, परतवाडा, जि. अमरावती.(प्रतिनिधी)