शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वकिलीतील शिखर गाठण्यासाठी परिश्रम आवश्यक : न्या. रोहित देव यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:37 IST

वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

ठळक मुद्देनवोदित वकिलांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वकिली व्यवसायात यशाचे शिखर गाठण्यासाठी अथक परिश्रम घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांनी बुधवारी नवोदित वकिलांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत न्या. देव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ‘नवोदित वकिलांनी काय करावे व काय करू नये आणि नवोदित वकिलांकडून न्यायालयाला असलेल्या अपेक्षा’ हा व्याख्यानाचा विषय होता. सुरुवातीचे अडथळे पार करून यशाचे शिखर गाठण्यापर्यंत प्रवास अतिशय सुंदर असतो. परंतु, ही अनुभूती प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी लक्ष्य ठरवून कृती करावी लागते. तसेच, वकिलामध्ये जिद्द, परिश्रम व समर्पण भावना आवश्यक असते. प्रत्येक न्यायमूर्ती वकिलांच्या विकासाचा विचार करीत असतात. त्यांना शिकण्याची संधी देत असतात. वकिलांनी त्या संधीचे सोने करायला हवे, असे न्या. देव यांनी सांगितले.वकिलांनी पक्षकार, न्यायमूर्ती व न्यायदान व्यवस्थेसोबत नेहमी प्रामाणिक असायला हवे. ज्ञानार्जन व संशोधनाकरिता त्यांनी केवळ संगणकावर अवलंबून राहू नये. कायद्याची पुस्तके व कॉमेंट्रीचा सखोल अभ्यास करावा, असेही न्या. देव यांनी सांगितले. हे व्याख्यान उच्च न्यायालयाच्या सभागृहात झाले. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी न्या. देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले तर, अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल