शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

परवाना देण्यास ‘आरबीआय’ चा नकार

By admin | Updated: May 27, 2014 01:41 IST

हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती.

नागपूर : हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती. तसे पत्रही रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने सरकारच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा व बुलडाणा बँकेला व्यवहाराचा परवाना देण्यास आरबीआयने चक्क नकार दिला आहे. त्यामुळे तीनही बँकांनी आरबीआयच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत २००२ मध्ये १५३ कोटींचा घोटाळा झाल्याने ही बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या व्यवहाराचा परवाना काढून घेतला होता. अशीच काहीशी अवस्था वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकेची आहे. या बँकेच्या माध्यमातून हंगामाच्या काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७० टक्के कर्जपुरवठा होत होता. या तीनही बँकांचे शेअर कॅपिटल ३१९ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत भरल्यास, बँकांना व्यवहार करण्याचा परवाना मिळू शकतो व शेतकर्‍यांनाही हंगामाच्या काळात कर्ज पुरवठा होऊ शकतो. या भावनेतून राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बँकांच्या परवाना प्राप्तीसाठी शेअर कॅपिटलच्या स्वरूपात ३१९ कोटी रुपयांची मदत करण्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यालयाला पत्र लिहून आर्थिक मदत करीत असल्याचे कळविले. रिझर्व्ह बँकेने परवाना नाकारण्याबद्दल केलेली कार्यवाही मागे घेण्याची विनंती केली. मात्र आरबीआयने सरकारची विनंती अमान्य करून, कार्यवाही मागे घेणे शक्य नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे तीनही जिल्हा बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या कारवाईविरोधात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अपील दाखल केले असून, उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ३० मे रोजी होणार असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)