शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

परवाना देण्यास ‘आरबीआय’ चा नकार

By admin | Updated: May 27, 2014 01:41 IST

हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती.

नागपूर : हंगामापूर्वी शेतकर्‍यांना जिल्हा बँकेतून पीक कर्ज उपलब्ध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात राज्याच्या मंत्रिमंडळाने सकारात्मक पावलेही उचलली होती. तसे पत्रही रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाला दिले होते. मात्र रिझर्व्ह बँकेने सरकारच्या पत्राला प्रतिसाद दिला नाही. विदर्भातील नागपूर, वर्धा व बुलडाणा बँकेला व्यवहाराचा परवाना देण्यास आरबीआयने चक्क नकार दिला आहे. त्यामुळे तीनही बँकांनी आरबीआयच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली. नागपूर जिल्हा सहकारी बँकेत २००२ मध्ये १५३ कोटींचा घोटाळा झाल्याने ही बँक आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेच्या व्यवहाराचा परवाना काढून घेतला होता. अशीच काहीशी अवस्था वर्धा व बुलडाणा जिल्हा बँकेची आहे. या बँकेच्या माध्यमातून हंगामाच्या काळात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना ७० टक्के कर्जपुरवठा होत होता. या तीनही बँकांचे शेअर कॅपिटल ३१९ कोटी रुपये रिझर्व्ह बँकेत भरल्यास, बँकांना व्यवहार करण्याचा परवाना मिळू शकतो व शेतकर्‍यांनाही हंगामाच्या काळात कर्ज पुरवठा होऊ शकतो. या भावनेतून राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत बँकांच्या परवाना प्राप्तीसाठी शेअर कॅपिटलच्या स्वरूपात ३१९ कोटी रुपयांची मदत करण्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय कार्यालयाला पत्र लिहून आर्थिक मदत करीत असल्याचे कळविले. रिझर्व्ह बँकेने परवाना नाकारण्याबद्दल केलेली कार्यवाही मागे घेण्याची विनंती केली. मात्र आरबीआयने सरकारची विनंती अमान्य करून, कार्यवाही मागे घेणे शक्य नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे तीनही जिल्हा बँकांनी रिझर्व्ह बँकेच्या कारवाईविरोधात केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयात अपील दाखल केले असून, उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी ३० मे रोजी होणार असल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)