शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बँकिंग क्षेत्रात रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:55 IST

देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मतबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बँकांचे आर्थिक धोरण ठरविते आणि पैलू पाहते व शिस्त लावते. सुरक्षित आर्थिक व्यवहारासह ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात याकडे लक्ष देते. नागरी बँकांना आर्थिक परवाना देते. देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष-२०२२ धोरण जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.सहकार भारतीय, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे अधिवेशन शेगांव येथे ४ व ५ ऑगस्टला होणार आहे. सतीश मराठे सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आहेत. अधिवेशनाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधला.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांसाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले आहे. बँकांची व्याप्ती, कार्य निष्पादन आदींसह विविध मार्गदर्शक तत्त्वांचा त्यात समावेश आहे. याकरिता समिती तयार करण्यास रिझर्व्ह बँकेने सुचविले आहे. यामुळे नागरी बँकांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढले. शिवाय लोकांना उत्तम सेवा मिळून नागरी बँकांचे सक्षमीकरण होणार आहे.राष्ट्रीयीकृत बँकासारखेच रिस्क मॅनेजमेंट, एचआर पॉलिसी, स्कील सेट, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, सायबर सिक्युरिटी तसेच बँक व ग्राहकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण नागरी सहकारी बँकांमध्ये असावे.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने १५ वर्षांत नवीन नागरी बँक सुरू होण्यासाठी आर्थिक परवाना दिलेला नाही. देशाच्या लोकसंख्येनुसार नागरी बँकांना आर्थिक परवाना देण्याची गरज आहे. दोन वर्षांपासून नागरी सहकारी बँकांना शेड्युल बँकेचा दर्जा मिळालेला नाही. तोसुद्धा मिळाला पाहिजे.राज्य आणि केंद्राच्या योजना उदा. केंद्राची सुकन्या योजना राष्ट्रीय बँकांप्रमाणे नागरी बँकांमध्ये राबविण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना शासनाने परतावा दिलेला आहे. हा परतावा अजूनही नागरी बँकांना शासनाने दिलेला नाही.लघु उद्योजकांना नागरी बँका कर्ज देतात. ते कर्ज बुडवितात तेव्हा विम्याचे संरक्षण मिळत नाही. याकरिता पुढाकार घेणार असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट नागरी बँकांसाठी लागू असावाबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट विशेष आहे. तो नागरी बँकांसाठी लागू करण्याची गरज असल्याचे मराठे यांनी सांगितले. यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी बँकांवर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याचे नियंत्रण आहे. सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला दिल्यास नागरी सहकारी बँकांच्या व्यवहारावर नियंत्रण आणि व्यवहारात नियमितता येईल. रिझर्व्ह बँकेला खासगी बँकांच्या मर्जिंगचे अधिकार आहेत. खासगी बँकेचा सीईओ, एमडी आणि संचालकांना बदलण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. देशात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर बँका हव्याच. मेक इन इंडिया योजनेतही सहकारी बँकांना केंद्र सरकारने जोडावे. अम्बेला ऑर्गनायझेशनला रिझर्व्ह बँकेला मंजुरी दिल्याचे मराठे यांनी सांगितले. चर्चेदरम्यान सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, अधिवेशन प्रमुख सुभाष जोशी, संयोजक आशिष चौबिसा आणि समन्वयक विवेक जुगादे उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक