शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

बँकिंग क्षेत्रात रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करीत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 12:55 IST

देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देभारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांचे मतबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रिझर्व्ह बँक देशातील बँकांचे आर्थिक धोरण ठरविते आणि पैलू पाहते व शिस्त लावते. सुरक्षित आर्थिक व्यवहारासह ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित राहाव्यात याकडे लक्ष देते. नागरी बँकांना आर्थिक परवाना देते. देशातील बँकांच्या आर्थिक व्यवहारात रिझर्व्ह बँक कधीच हस्तक्षेप करीत नसल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने उत्कर्ष-२०२२ धोरण जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.सहकार भारतीय, महाराष्ट्र प्रदेशतर्फे महाराष्ट्रातील सर्व नागरी सहकारी बँकांचे अधिवेशन शेगांव येथे ४ व ५ ऑगस्टला होणार आहे. सतीश मराठे सहकार भारतीचे संस्थापक सदस्य आहेत. अधिवेशनाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता त्यांनी लोकमतशी संवाद साधला.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने नागरी बँकांसाठी व्हिजन डाक्युमेंट तयार केले आहे. बँकांची व्याप्ती, कार्य निष्पादन आदींसह विविध मार्गदर्शक तत्त्वांचा त्यात समावेश आहे. याकरिता समिती तयार करण्यास रिझर्व्ह बँकेने सुचविले आहे. यामुळे नागरी बँकांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर वाढले. शिवाय लोकांना उत्तम सेवा मिळून नागरी बँकांचे सक्षमीकरण होणार आहे.राष्ट्रीयीकृत बँकासारखेच रिस्क मॅनेजमेंट, एचआर पॉलिसी, स्कील सेट, इन्व्हेस्टमेंट पॉलिसी, सायबर सिक्युरिटी तसेच बँक व ग्राहकांच्या दृष्टीने सर्वसमावेशक धोरण नागरी सहकारी बँकांमध्ये असावे.मराठे म्हणाले, रिझर्व्ह बँकेने १५ वर्षांत नवीन नागरी बँक सुरू होण्यासाठी आर्थिक परवाना दिलेला नाही. देशाच्या लोकसंख्येनुसार नागरी बँकांना आर्थिक परवाना देण्याची गरज आहे. दोन वर्षांपासून नागरी सहकारी बँकांना शेड्युल बँकेचा दर्जा मिळालेला नाही. तोसुद्धा मिळाला पाहिजे.राज्य आणि केंद्राच्या योजना उदा. केंद्राची सुकन्या योजना राष्ट्रीय बँकांप्रमाणे नागरी बँकांमध्ये राबविण्याची गरज आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तेव्हा जिल्हा बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांना शासनाने परतावा दिलेला आहे. हा परतावा अजूनही नागरी बँकांना शासनाने दिलेला नाही.लघु उद्योजकांना नागरी बँका कर्ज देतात. ते कर्ज बुडवितात तेव्हा विम्याचे संरक्षण मिळत नाही. याकरिता पुढाकार घेणार असल्याचे मराठे यांनी स्पष्ट केले.बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट नागरी बँकांसाठी लागू असावाबँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट विशेष आहे. तो नागरी बँकांसाठी लागू करण्याची गरज असल्याचे मराठे यांनी सांगितले. यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरी बँकांवर रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याचे नियंत्रण आहे. सर्व अधिकार रिझर्व्ह बँकेला दिल्यास नागरी सहकारी बँकांच्या व्यवहारावर नियंत्रण आणि व्यवहारात नियमितता येईल. रिझर्व्ह बँकेला खासगी बँकांच्या मर्जिंगचे अधिकार आहेत. खासगी बँकेचा सीईओ, एमडी आणि संचालकांना बदलण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला आहेत. देशात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर बँका हव्याच. मेक इन इंडिया योजनेतही सहकारी बँकांना केंद्र सरकारने जोडावे. अम्बेला ऑर्गनायझेशनला रिझर्व्ह बँकेला मंजुरी दिल्याचे मराठे यांनी सांगितले. चर्चेदरम्यान सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी, अधिवेशन प्रमुख सुभाष जोशी, संयोजक आशिष चौबिसा आणि समन्वयक विवेक जुगादे उपस्थित होते.

टॅग्स :bankबँक