शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

विधी सेवा संमेलनाच्या उद्घाटनासाठी रविशंकर प्रसाद येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:33 IST

राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन दिवशीय संमेलन १७ व १८ ऑगस्ट रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे होणार आहे. या संमेलनात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील.

ठळक मुद्देनागपूरला पहिल्यांदाच मानदेशभरातील १०० वर न्यायाधीश होणार सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य विधी सेवा प्राधिकरणांच्या १७ व्या अखिल भारतीय संमेलनाचे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. हे दोन दिवशीय संमेलन १७ व १८ ऑगस्ट रोजी वर्धा रोडवरील हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे होणार आहे. या संमेलनात देशभरातील १०० वर न्यायाधीश सहभागी होतील.उद्घाटन कार्यक्रमाला १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.१५ वाजता सुरुवात होईल. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती एन. व्ही. रामना, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांदराजोग, न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी व नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर राज्य विधी सेवा प्राधिकरणे आणि उच्च न्यायालय विधी सेवा समित्यांचे अध्यक्ष व सचिवांच्या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत न्यायव्यवस्था अधिक प्रभावी करणे, समाजातील गरजू व्यक्तींना नि:शुल्क व सक्षम विधी सेवा उपलब्ध करून देणे, कारागृहात विधी सेवा, गुन्हे पीडितांना भरपाई, पर्यायी वाद निवारण यंत्रणा इत्यादी मुद्यांवर चर्चा करून आवश्यक निर्णय घेतले जातील. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे प्रधान न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्याचा मान नागपूरला पहिल्यांदाच मिळाला आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर