शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : ५० टक्के परीक्षांची जबाबदारी राहणार महाविद्यालयांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:04 IST

हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देप्राध्यापकांवरील ताण वाढणार, विद्यापीठाचे ओझे हलके

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात आली आहे. २०२१-२२ च्या पहिल्या सत्रापासून याची अंमलबजावणी होणार असून, २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांनाच घ्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली असून, यामुळे विद्यापीठाचे ओझे हलके होणार आहे, तर दुसरीकडे महाविद्यालयांतील प्राध्यापकांवरील ताण वाढणार आहे.

डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे कुलगुरू असताना ५०-५० परीक्षांचा फॉर्म्युला त्यांनी प्रस्तावित केला होता. परंतु त्याला महाविद्यालयांचा विरोध झाला होता. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुढाकार घेतला व ९ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेनेदेखील हिरवी झेंडी दिली होती. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे.

यानुसार या सत्रापासून पहिल्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. राज्य शासनाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांचे प्रवेश होत नाहीत, अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा या पद्धतीने होणार आहेत. यासंदर्भातील विस्तृत नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर

विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर आहे. अगोदरच अनेक ठिकाणी प्राध्यापकांची कमतरता आहे. त्यातच वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध समित्यांच्या दौऱ्याची तयारी करणे व इतर प्रशासकीय कामांत प्राध्यापक पूर्णत: व्यस्त असतात. अशा स्थितीत परीक्षादेखील घेण्याची जबाबदारी आली, तर ताण वाढणार असल्याची भावना एका मोठ्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. प्राचार्य फोरम यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू उचलून धरेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाकडे परीक्षा घेण्याचेच काम होते. आता तेदेखील ५० टक्क्यांनी कमी होणार असेल तर ते त्यांच्या सोयीचेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून परीक्षा

बीए. बीएस्सी, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीसीए, बीए (आरएस), बीएस्सी (गृहविज्ञान), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीटी, बीएफडी, बीआयडी, बीटीएस, बीजेडी, बीएस्सी (फायनान्स), बीव्होक, बीएसडब्लू, बी.लिब. व इतर

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ