शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्राचार्य ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 23:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देएकालाही उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार नाही : साडेचारशे महाविद्यालयातून आला अवघा एक अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक दर्जा वाढविण्याचे विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागपूर विद्यापीठातील प्राचार्यांची गुणवत्तादेखील तपासण्याची वेळ आली आहे. विद्यापीठात यंदा एकाही प्राचार्याला उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार मिळू शकला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे साडेचारशे महाविद्यालयातून या पुरस्कारासाठी अवघा एक अर्ज आला व गुणवत्तेच्या मापदंडात बसत नसल्याने संबंधित प्राचार्यांना अपात्र ठरविण्यात आले. जर प्राचार्यांची ही स्थिती असेल तर मग शिक्षक व विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारांचे वितरण होते. या पुरस्कारांत उत्कृष्ट प्राचार्य हादेखील पुरस्कार असतो. यासाठी प्राचार्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. मागील वर्षीपर्यंत या पुरस्कारासाठी दहा किंवा त्याहून अधिक अर्ज यायचे. यंदा अर्ज मागवितानाच विद्यापीठाने पात्रतेचे निकष स्पष्ट केले होते. या निकषांच्या आधारावर देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये ४५ टक्के गुण मिळविणे अनिवार्य होते.उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी अवघा एकच अर्ज आला. निकषांच्या पातळीवर मूल्यमापन केले असता संबंधित एका प्राचार्याला ४५ टक्क्यांचा टप्पा गाठता आला नाही. त्यामुळे एकालाही पुरस्कार घोषित न करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घेतला.गुणवत्ता वाढीसाठी निकष ठरविलेयासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनीदेखील प्राचार्यांच्या गटातून अवघा एकच अर्ज आल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. दर वर्षी एक अर्ज आला असेल तर संबंधित व्यक्तीला पुरस्कार मिळत होता. मात्र यंदा आम्ही नियम कठोर केले व मापदंड निश्चित केले. एका दृष्टीने ही प्राचार्यांची परीक्षाच होती. यात त्यांना यश मिळविता आले नाही. पुरस्कारांचा दर्जा वाढावा व त्यानिमित्ताने गुणवत्ता वाढीसाठी महाविद्यालयांमध्ये प्रयत्न व्हावेत, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिक्षकांचे सामाजिक कार्य घटले का ?विद्यापीठातर्फे सामाजिक कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार देण्यात येतो. यासाठीदेखील अर्ज मागविण्यात आले होते. या गटातदेखील अवघा एकच अर्ज आला. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी केवळ ११ अर्ज आले.अर्जांची स्थितीपुरस्कार                  आलेले अर्ज                निवडउत्कृष्ट प्राचार्य                 १                               -उत्कृष्ट शिक्षक               २०                             २उत्कृष्ट संशोधक            ११                             १उत्कृष्ट लेखक                ३                              १उत्कृष्ट सामाजिक कार्य  १                              -

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर