शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

रणजीत देशमुखांची मालमत्ता जप्त होणार; आयडीबीआय बँकेचे ५.७० कोटी थकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 21:28 IST

माजी मंत्री व काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे ५ कोटी ७० लाख रुपयांचे थकित कर्ज अद्याप भरलेले नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याची तयारी बँकेने केली आहे.

ठळक मुद्दे२० रोजी कारवाईची शक्यताअतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेशही पाळले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मंत्री व काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे ५ कोटी ७० लाख रुपयांचे थकित कर्ज अद्याप भरलेले नाही. अतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिलेला आदेशही त्यांनी झुगारला. बँकेने वारंवार तगादा लावल्यानंंतरही देशमुख यांनी कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याची तयारी बँकेने केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या मदतीने मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई म्हणजे देशमुख यांच्या प्रतिष्ठेला मोठ्ठा धक्का असेल.रणजीत देशमुख यांनी आयडीबीआय बँकेच्यासिव्हिल लाईन्स शाखेकडून ५ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या बदल्यात त्यांनी आपली काही मालमत्ता बँकेला गहाण करुन दिली होती. बँकेच्या माहितीनुसार देशमुख यांनी कर्जाची परतफेड नियमित स्वरुपात केली नाही. बँकेकडून थकबाकी वसुलीसाठी त्यांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या होत्या. अखेर या प्रकरणी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी के.एन.के. राव यांच्या कोर्टात सुनावणी झाली. आर्थिक मालमत्ता सुरक्षितकरण व पुननिर्माण आणि सुरक्षा अधिकार क्रियान्वयन कायदा-२०१२ चे कलम १४(२) नुसार कोर्टाने थकित रक्कम भरण्यासाठी रणजीत देशमुख यांना १ आॅगस्ट २०१७ रोजी आदेश पारित केला होता. या आदेशानंंतरही देशमुख यांनी कर्जाची परतफेड केली नाही. यानंतर बँकेनेही त्यांच्याकडे थकबाकीसाठी तगादा लावला होता. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. रणजीत देशमुख यांची मालमत्ता जप्त करून आयडीबीआय बँकेकडे रितसर ताबा द्यावा आणि अंबाझरी पोलीस ठाण्याने पुरेशा पोलीस बंदोबस्त घेऊन मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी सहकार्य करावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, या दृष्टीने कार्यवाही करावी, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी राव यांनी १ आॅगस्ट २०१७ ला दिलेल्या आदेशात म्हटले होते.प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी आयडीबीआय बँकेने दावा दाखल करताना २७ आॅक्टोबर २०१५ रोजी कलम १३(२) अंतर्गत पाठविलेली ‘मागणी नोटीस’ची प्रत, मागणी नोटीस परसेप्ट वेब सोल्युशन प्रा.लि., रणजीत अरविंदबाबू देशमुख आणि रूपा रणजीत देशमुख यांना तामिळ केल्याबाबतची पोचपावती, पझेशन नोटीस, टायटल सर्च रिपोर्ट, मॉडगेज डीड, स्टेटमेंट आॅफ अकाऊंट आणि सेल डीड इत्यादी दस्तावेज जोडले होते. कर्ज घेताना रणजीत देशमुख यांनी बँकेकडे संपत्ती गहाण ठेवली होती. बँकेने जोडलेली कागदपत्रे रणजीत देशमुख यांच्या मालकीची असल्याचे दिसून आले. देशमुख यांनी कर्जाच्या रकमेची बँकेला नियमित परतफेड केली नाही व कर्ज खाते पूर्णत: अनियमित असल्याचे सुनावणीदरम्यान राव यांना दिसून आले. गहाण ठेवलेली मिळकत ही नागपूर जिल्ह्यात असून या प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात येते. आर्थिक मालमत्ता सुरक्षितकरण व पुननिर्माण आणि सुरक्षा अधिकार क्रियान्वयन कायदा-२०१२ चे कलम १४(२) नुसार अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी के.एन.के. राव यांनी रणजीत देशमुख यांनी संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते.यापूर्वीही टळली बंगल्यावरील जप्तीमाजी मंत्री रणजित देशमुख यांच्या सावनेर तालुक्यातील हेटी-सुर्ला येथील साखर कारखान्याकडे थकीत असलेली रक्कम न मिळाल्याने पुसद येथील शेतकरी धनंजय तडकसे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्णयानंतरही रक्कम न मिळाल्याचे शेतकऱ्याने निदर्शनास आणून दिल्यावर सावनेर येथील दिवानी न्यायालयाने जप्तीचा आदेश काढला. या आदेशानुसार ७ डिसेंबर २०१७ रोजी शेतकरी, जप्ती पथक व पोलीस देशमुख यांच्या बंगल्यावर धडकले होते. मात्र, त्यावेळी त्यांचे पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी एक लाख रुपये भरून उर्वरित रक्कम लवकरच देण्याची हमी दिल्यावर जप्ती टळली होती. या घटनेनंतरही देशमुख यांनी बोध घेतला नाही. आता पुन्हा आयडीबीआय बँकेच्या जप्ती वारंटच्या निमित्ताने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली आहे.

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख