शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

रणजित देशमुखांची धाकटे चिरंजीव अमोल यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:37 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आपला धाकटा मुलगा डॉ. अमोल यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली आहे.

ठळक मुद्देराहत्या घरावर अवैध कब्जा केल्याचा आरोपमानसिक छळाचीही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनाागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी आपला धाकटा मुलगा डॉ. अमोल यांच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली आहे. सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल यांनी अवैधरित्या कब्जा केला आहे. वारंवार सांगूनही तो घर रिकामे करण्यास तयार नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रणजितबाबू यांनी दाखल केली आहे. देशमुख पिता-पुत्रांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मात्र, रणजितबाबू यांनी केलेल्या पोलीस तक्रारीमुळे आता त्यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. रणजित देशमुख यांचे आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. अमोल देशमुख हे दोन पुत्र आहेत. डॉ. आशिष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बरकत’ या बंगल्यात स्वतंत्र राहतात. तर डॉ. अमोल यांचे नागपुरात दुसरीकडेही घर आहे. मात्र, ते गेल्या काही वर्षांपासून त्यांचे जीपीओ चौकातील रणजितबाबू यांच्या घरातही वास्तव्य होते. देशमुख देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. वयाच्या उत्तरार्धात त्यांनी आपल्या धाकट्या मुलाविरोधात घर खाली करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. गेल्या दीड महिन्यापासून रणजीतबाबू हे पुत्र आमदार आशिष देशमुख यांच्याकडे वास्तव्यास आहेत. आशिष हेच त्यांची काळजी घेत आहेत.  सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. आपल्या मुलाने घराचे कुलुप तोडून कथित भागावर कब्जा केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. त्याने या भागावर कब्जा करू नये यासाठी खासगी सुरक्षारक्षक देखील तैनात केल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. या प्रकरणी देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सीताबर्डी पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत खराबे यांनी सांगितले. हा घरगुती वाद असून पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.घरात मुलांचा हस्तक्षेप नको : रणजित देशमुख मला माझ्या घरात मुलांचा हस्तक्षेप नको आहे. सिव्हिल लाईन्स येथील घर रिकामे करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून त्याला सांगत आहे. मात्र, त्याने ऐकले नाही. त्याच्या वास्तव्यामुळे माझी प्रायव्हसी भंग होत आहे. मला मोकळेपणा वाटत नाही. अमोलला मी नागपुरात दोन घरे घेऊन दिली आहेत. त्याने तेथे आपला संसार थाटावा. मात्र, तो तसे न करता माझ्या घराचा ताबा सोडण्यास तयार नाही. मी वारंवार विनंती करूनही त्याच्यावर काहीच परिणाम झालेला नाही. उलट तो अधिक आक्रमक होऊ लागला आहे. त्यामुळे मला नाईलाजास्तव माझे घर त्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी पोलिसात धाव घ्यावी लागली आहे असे रणजित देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

 

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख