शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

रामटेकमध्ये महाकवी कालिदासाच्या नशिबी विरह वेदनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

राहुल पेठकर रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. ...

राहुल पेठकर

रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासाने आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासाच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येथे महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

‘कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्या यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासाची तीन महाकाव्य मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम् तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम्,आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगावर भारतातील विख्यात चित्रकार मधु पोवळे, मुरली लाहोटी,वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचिञे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व.मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ओमची निर्मिती करण्यात आली. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाईल्सच्या तुकड्यापासून कालिदासाच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व.श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहे. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते. पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहे. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसापूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र विद्युत रोशणाई नसल्यात जमा आहे. या भागात वृक्ष लागवड केली गेली नाही. त्यामुळे हा भाग ओसाड झाला आहे.

आषाढस्य प्रथम दिवसे सगळीकडे साजरा होत असताना रामटेक नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. ना रोषणाईची व्यवस्था ना कोणता कार्यक्रम. रामटेकचे काही कवी मात्र या दिवसाची आठवण म्हणून कालिदासाच्या या रमणीय सहवासात दरवर्षी कविसंमेलन घेत असतात. संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने येथे कविसंमेलन घेण्यात आले आहे.

--

कालिदास स्मारकबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. यामध्ये संस्कृत विद्यापीठाने कालिदास स्मारकारच्या देखभालीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार यात्रा विकास समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने काही माहिती मागितली आहे. त्याची पूर्तता झाली की रीतसर या स्मारकाचे हस्तांतरण विद्यापीठाला होईल.

- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद