शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकमध्ये महाकवी कालिदासाच्या नशिबी विरह वेदनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

राहुल पेठकर रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. ...

राहुल पेठकर

रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासाने आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासाच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येथे महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

‘कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्या यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासाची तीन महाकाव्य मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम् तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम्,आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगावर भारतातील विख्यात चित्रकार मधु पोवळे, मुरली लाहोटी,वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचिञे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व.मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ओमची निर्मिती करण्यात आली. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाईल्सच्या तुकड्यापासून कालिदासाच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व.श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहे. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते. पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहे. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसापूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र विद्युत रोशणाई नसल्यात जमा आहे. या भागात वृक्ष लागवड केली गेली नाही. त्यामुळे हा भाग ओसाड झाला आहे.

आषाढस्य प्रथम दिवसे सगळीकडे साजरा होत असताना रामटेक नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. ना रोषणाईची व्यवस्था ना कोणता कार्यक्रम. रामटेकचे काही कवी मात्र या दिवसाची आठवण म्हणून कालिदासाच्या या रमणीय सहवासात दरवर्षी कविसंमेलन घेत असतात. संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने येथे कविसंमेलन घेण्यात आले आहे.

--

कालिदास स्मारकबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. यामध्ये संस्कृत विद्यापीठाने कालिदास स्मारकारच्या देखभालीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार यात्रा विकास समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने काही माहिती मागितली आहे. त्याची पूर्तता झाली की रीतसर या स्मारकाचे हस्तांतरण विद्यापीठाला होईल.

- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद