शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

रामटेकमध्ये महाकवी कालिदासाच्या नशिबी विरह वेदनाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:06 IST

राहुल पेठकर रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. ...

राहुल पेठकर

रामटेक : महाकवी कालिदासाचे महाकाव्य उत्कृष्ट काव्याचा नमुना म्हटले जाते आणि जगभरात त्यांच्या काव्यावर संशोधन सुरू आहे. कालिदासाने आयुष्यभर अनुभवलेला प्रेमविरह अनेकांच्या जास्त ओळखीचा आहे आणि त्याची तीव्रता अजरामर अशा मेघदूतमधील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या ओळीने आणखीनच प्रखर होते. कालिदासाच्या आयुष्याचा तो विरह कधी संपणार हा प्रश्न आहे. रामटेकमध्ये असलेल्या कालिदास स्मारकाची दुरवस्था बघून, हा प्रश्न अधिकच प्रबळ होतो.!

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ म्हटले की आपल्याला आठवण येथे महाकवी कालिदासांची....त्यामुळे आषाढाचा पहिला दिवस महाकवी कालिदास दिवस म्हणूनही साजरा केला जातो.

‘कालिदासांच्या’या आठवणी जपल्या जाव्या यासाठी येथे कालिदास स्मारक तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. १० डिसेंबर १९६८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ३ लाख ४९ हजार रुपये खर्च करून हे स्मारक उभारले. त्याचे उद्घाटन १२ डिसेंबर १९७३ ला झाले.

या स्मारकात कालिदासाची तीन महाकाव्य मेघदुतम्, कुमारसंभवम् आणि रघुवंशम् तसेच तीन नाटके मालविकाग्निमित्रम्, विक्रमोर्वशीयम्,आणि शाकुंतलम् यातील विविध प्रसंगावर भारतातील विख्यात चित्रकार मधु पोवळे, मुरली लाहोटी,वासुदेव स्मार्त, शांताराम कामत, दिनेश शाह आणि वामन करंजेकर यांनी काढलेली तैलचिञे लावली आहेत. या स्मारकाच्या दिमतीला तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व माजी मंत्री स्व.मधुकरराव किंमतकर यांच्या कल्पनेतून एक भव्य ओमची निर्मिती करण्यात आली. जयपुरी दगडात बांधलेली ही वास्तू अद्वितीय आहे. तिथे टाईल्सच्या तुकड्यापासून कालिदासाच्या नाटकातील प्रसंग रेखाटले आहेत. यासाठी स्व.श्रीकांत जिचकार यांनी पुढाकार घेतला होता. ‘ओम’च्या आत पर्यटकांना आकर्षित करणारे संगीत कारंजे लावले आहे. बगिचा बनविला. अतिशय सुंदर असे हे ठिकाण बनविले गेले. त्यानंतर हे नगर परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले.

नगर परिषदेने ठरविले असते आणि शासनाने मदत केली असती तर हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ झाले असते. पण तसे झाले नाही. आज बगिचा उजाड झाला आहे. संगीत कारंजे बंद पडले आहे. भित्तीचित्र नीरस झाले आहे. काही दिवसापूर्वी तर येथे वीज पुरवठाही नव्हता. आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र विद्युत रोशणाई नसल्यात जमा आहे. या भागात वृक्ष लागवड केली गेली नाही. त्यामुळे हा भाग ओसाड झाला आहे.

आषाढस्य प्रथम दिवसे सगळीकडे साजरा होत असताना रामटेक नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. ना रोषणाईची व्यवस्था ना कोणता कार्यक्रम. रामटेकचे काही कवी मात्र या दिवसाची आठवण म्हणून कालिदासाच्या या रमणीय सहवासात दरवर्षी कविसंमेलन घेत असतात. संस्कृत विद्यापीठाच्या सहकार्याने येथे कविसंमेलन घेण्यात आले आहे.

--

कालिदास स्मारकबाबत नगर परिषदेने एक ठराव घेतला आहे. यामध्ये संस्कृत विद्यापीठाने कालिदास स्मारकारच्या देखभालीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार यात्रा विकास समितीने हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने काही माहिती मागितली आहे. त्याची पूर्तता झाली की रीतसर या स्मारकाचे हस्तांतरण विद्यापीठाला होईल.

- हर्षल गायकवाड, मुख्याधिकारी, रामटेक, नगर परिषद