शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
3
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
4
“RSS बंदी असलेली संघटना आहे का?”; CM फडणवीसांचे सुनेत्रा पवारांवरील टीकेला प्रत्युत्तर
5
Dream 11 लव्हर्सचा 'गेम ओव्हर'! टीम इंडियाच्या जर्सीवरुनही 'गायब' होणार नाव? जाणून घ्या सविस्तर
6
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स
7
Kim Jong Un: मुलांना जवळ घेतलं, सैनिकांना दिला धीर, हुकुमशाह किम जोंग उन यांचे डोळे का पाणावले?
8
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
9
Shani Amavasya 2025: देवघरात शनि देवाची मूर्ति किंवा प्रतिमा न ठेवण्यामागे काय आहे कारण?
10
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
11
Hero ने फक्त १ लाख रुपयांना लॉन्च केली दमदार बाईक, जाणून घ्या फिचर्स...
12
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
आधी लोकांची फसवणूक केली, नंतर तुरुंगात जायला लागू नये म्हणून महिलेनं काय शक्कल लढवली वाचाच!
14
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
15
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
16
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; एक तरुण आला आणि...
17
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
18
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
19
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
20
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

रामदास आठवले म्हणतात, मोदीच पुढील पाच वर्षे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:52 IST

लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देमुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.रालोआला लोकसभा निवडणुकांत २६० हून अधिक जागा मिळतील व नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान राहतील. नितीन गडकरी हे अतिशय कर्तृत्ववान मंत्री आहेत व पुढील कार्यकाळदेखील दमदार असेल. पाच वर्षांनंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी यांंचे नाव आले तर चांगलीच गोष्ट असेल, असे आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकांत ईशान्येकडील राज्य, पश्चिम बंगाल येथे रालोआच्या जागा वाढतील. विरोधकांमध्ये एकमत नाही. शिवाय पंतप्रधान बनण्यासाठी त्यांच्या गटातील अनेक जण इच्छुक आहेत. एकमत नाही ते निवडणुकांत काय विजय मिळविणार, असे आठवले यांनी प्रतिपादन केले.मुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे सपा-बसपाला फटकालोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला फटका बसेल. मुलायमसिंह हे मुरलेले राजकारणी आहेत. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक बोलतात. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मानणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. अखिलेशनी वडिलांना बाजूला सारत पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. सपाचे जुने नेते सपा-बसपा या आघाडीमुळे नाराज आहेत. निवडणुकांच्या वेळी ही नाराजी स्पष्टपणे दिसून येईल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुलायमसिंह यांनी मोदींबाबत जी भावना व्यक्त केली, ती संपूर्ण देशाच्या मनातील आहे. मुलायम यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणखी मजबूत झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.आंबेडकरांनी महायुतीत यावेयावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवरदेखील भाष्य केले. बहुजन वंंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर भाजपाला अप्रत्यक्ष फायदाच पोहोचवत आहेत. सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होत नसते हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. एआयएमआयएम सारख्या हिंदूविरोधी पक्षासोबत राहुन त्यांच्या पदरी पराभवच पडणार आहे. त्यापेक्षा त्यांनी थेट महायुतीत समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवीरालोआतील घटक पक्षांच्या युतीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेने मतभेदांना तिलांजली देऊन एकत्र येण्याची गरज आहे. स्वत:साठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. तसेच या जागेच्या मोबदल्यात भाजपच्या कोट्यातून आपण शिवसेनेला दुसरी जागा मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदी