शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रामदास आठवले म्हणतात, मोदीच पुढील पाच वर्षे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:52 IST

लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देमुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.रालोआला लोकसभा निवडणुकांत २६० हून अधिक जागा मिळतील व नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान राहतील. नितीन गडकरी हे अतिशय कर्तृत्ववान मंत्री आहेत व पुढील कार्यकाळदेखील दमदार असेल. पाच वर्षांनंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी यांंचे नाव आले तर चांगलीच गोष्ट असेल, असे आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकांत ईशान्येकडील राज्य, पश्चिम बंगाल येथे रालोआच्या जागा वाढतील. विरोधकांमध्ये एकमत नाही. शिवाय पंतप्रधान बनण्यासाठी त्यांच्या गटातील अनेक जण इच्छुक आहेत. एकमत नाही ते निवडणुकांत काय विजय मिळविणार, असे आठवले यांनी प्रतिपादन केले.मुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे सपा-बसपाला फटकालोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला फटका बसेल. मुलायमसिंह हे मुरलेले राजकारणी आहेत. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक बोलतात. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मानणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. अखिलेशनी वडिलांना बाजूला सारत पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. सपाचे जुने नेते सपा-बसपा या आघाडीमुळे नाराज आहेत. निवडणुकांच्या वेळी ही नाराजी स्पष्टपणे दिसून येईल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुलायमसिंह यांनी मोदींबाबत जी भावना व्यक्त केली, ती संपूर्ण देशाच्या मनातील आहे. मुलायम यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणखी मजबूत झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.आंबेडकरांनी महायुतीत यावेयावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवरदेखील भाष्य केले. बहुजन वंंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर भाजपाला अप्रत्यक्ष फायदाच पोहोचवत आहेत. सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होत नसते हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. एआयएमआयएम सारख्या हिंदूविरोधी पक्षासोबत राहुन त्यांच्या पदरी पराभवच पडणार आहे. त्यापेक्षा त्यांनी थेट महायुतीत समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवीरालोआतील घटक पक्षांच्या युतीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेने मतभेदांना तिलांजली देऊन एकत्र येण्याची गरज आहे. स्वत:साठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. तसेच या जागेच्या मोबदल्यात भाजपच्या कोट्यातून आपण शिवसेनेला दुसरी जागा मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदी