शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले म्हणतात, मोदीच पुढील पाच वर्षे पंतप्रधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 19:52 IST

लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देमुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपाला फायदा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांत रालोआची सत्ता आली तर पुढील पंतप्रधान कोण असेल याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. मात्र २०१९ ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढत आहोत आणि पुढील पाच वर्षेदेखील तेच पंतप्रधान राहतील, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नागपुरात रविभवन येथे पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.रालोआला लोकसभा निवडणुकांत २६० हून अधिक जागा मिळतील व नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान राहतील. नितीन गडकरी हे अतिशय कर्तृत्ववान मंत्री आहेत व पुढील कार्यकाळदेखील दमदार असेल. पाच वर्षांनंतर पंतप्रधानपदासाठी गडकरी यांंचे नाव आले तर चांगलीच गोष्ट असेल, असे आठवले म्हणाले. लोकसभा निवडणुकांत ईशान्येकडील राज्य, पश्चिम बंगाल येथे रालोआच्या जागा वाढतील. विरोधकांमध्ये एकमत नाही. शिवाय पंतप्रधान बनण्यासाठी त्यांच्या गटातील अनेक जण इच्छुक आहेत. एकमत नाही ते निवडणुकांत काय विजय मिळविणार, असे आठवले यांनी प्रतिपादन केले.मुलायमसिंहांच्या वक्तव्यामुळे सपा-बसपाला फटकालोकसभेत मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांची प्रशंसा केल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या आघाडीला फटका बसेल. मुलायमसिंह हे मुरलेले राजकारणी आहेत. प्रत्येक गोष्ट ते विचारपूर्वक बोलतात. उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मानणारे मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. अखिलेशनी वडिलांना बाजूला सारत पक्षाची सूत्रे स्वत:कडे घेतली होती. सपाचे जुने नेते सपा-बसपा या आघाडीमुळे नाराज आहेत. निवडणुकांच्या वेळी ही नाराजी स्पष्टपणे दिसून येईल, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. मुलायमसिंह यांनी मोदींबाबत जी भावना व्यक्त केली, ती संपूर्ण देशाच्या मनातील आहे. मुलायम यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणखी मजबूत झाली आहे, असेदेखील ते म्हणाले.आंबेडकरांनी महायुतीत यावेयावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांवरदेखील भाष्य केले. बहुजन वंंचित आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर भाजपाला अप्रत्यक्ष फायदाच पोहोचवत आहेत. सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होत नसते हे प्रकाश आंबेडकरांनी लक्षात घ्यावे. एआयएमआयएम सारख्या हिंदूविरोधी पक्षासोबत राहुन त्यांच्या पदरी पराभवच पडणार आहे. त्यापेक्षा त्यांनी थेट महायुतीत समाविष्ट व्हावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.दक्षिण-मध्य मुंबईची जागा हवीरालोआतील घटक पक्षांच्या युतीवर भाष्य करताना आठवले म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेने मतभेदांना तिलांजली देऊन एकत्र येण्याची गरज आहे. स्वत:साठी शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या दक्षिण-मध्य मुंबईतील लोकसभेच्या जागेची मागणी केली आहे. तसेच या जागेच्या मोबदल्यात भाजपच्या कोट्यातून आपण शिवसेनेला दुसरी जागा मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदी