शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

रामदास आठवले यांनी सोडला रिपब्लिकन ऐक्याचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 20:33 IST

Nagpur News विविध गटांमध्ये विखुरलेल्या रिपाइं पक्षाचे एकीकरण व्हावे, यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अखेर ऐक्याचा नाद सोडला. शनिवारी नागपुरात पत्रपरिषदेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

ठळक मुद्देदलित पँथर पुन्हा सक्रिय करणारपक्षवाढीवर देणार भर

नागपूर : विविध गटांमध्ये विखुरलेल्या रिपाइं पक्षाचे एकीकरण व्हावे, यासाठी नेहमीच अग्रेसर असलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अखेर ऐक्याचा नाद सोडला. शनिवारी नागपुरात पत्रपरिषदेत त्यांनी ही बाब स्पष्ट केली. रिपाइंच्या ऐक्याकडे आता जास्त लक्ष न देता स्वत:चा पक्ष देशभरात वाढविण्यावर आपला जास्त भर राहील, असे स्पष्ट केले. रिपाइंसोबत युवकांना जोडण्यासाठी दलित पँथर पुन्हा सक्रिय करणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी जाहीर केले. (Ramdas Athavale leaved the fond of Republican unity)

शेतकरी कायद्यासंदर्भात आठवले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून, ते बदलविणे शक्य नाही. कायद्यात काही बदल करायचा असेल तर ती सूचना मान्य करता येईल. या कायद्याला केवळ काही राज्यांतील शेतकरीच विरोध करीत आहेत. मोदी सरकार हे सबका साथ सबका विकास, या धोरणावर काम करीत आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काळात जन-धन योजना, मुद्रा लोन आदी योजनांमध्ये किती लोकांना लाभ मिळाला, याची आकडेवारीही जाहीर केली. अनुसूचित जातीच्या बजेटमध्ये वाढ झाल्याचेही स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत रिपाइं भाजपसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातीच्या मतदारांवर मायावतींचा अधिकार नाही. ते मतदार पूर्वी रिपाइंचेच असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेत प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, राजन वाघमारे, बाळू घरडे, सतीश तांबे, मनोज मेश्राम उपस्थित होते.

दीक्षाभूमीचे ६० काेटी महाविकास आघाडीने तातडीने द्यावेत

भाजप सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या काळात दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांची घोषणा केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ४० कोटी रुपये दिले होते. उर्वरित ६० कोटी रुपये राज्यातील महाविकास आघाडी सरकारने तातडीने दीक्षाभूमीच्या विकासासाठी द्यावेत, अशी मागणीसुद्धा आठवले यांनी यावेळी केली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले