शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

समाजावर संस्कार करते रामकथा

By admin | Updated: January 12, 2016 03:24 IST

संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले.

विजय कौशल महाराज : रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरुवातनागपूर : संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले. श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे काटोल रोडवरील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. महोत्सवात बोलताना विजय कौशल महाराज यांनी रामकथेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, भगवान शिव हे देवी पार्वती यांना रामकथा सांगण्यापूर्वी त्यामागची भूमिका स्पष्ट करतात. या भूमिकेपासून रामकथेला सुरुवात होते. भगवान शिव हे पार्वतीला म्हणतात, देवी तूने समाजासाठी कल्याणकारी व पवित्र रामकथा ऐकविण्याचा आग्रह केला आहे. यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही. देव निर्गुण व निराकार आहे किंवा तो न निर्गुण आहे न निराकार. नास्तिक लोक देवाचे अस्तित्व व त्यांच्या भक्तीवर नाना टीका करतात. देवाला नैवेद्य का ठेवायचा, मूर्तीची पूजा कशाला करायची, देव बोलत का नाही असे प्रश्न विचारले जातात. वास्तविक देव तोच आहे, जो भक्ताच्या मनात असलेल्या रूपात प्रगट होतो. भक्तासाठी देव नोकर, मित्र, सहकारी यासह कित्येक विविध रूपात प्रगट झाले आहेत. अशा अनेक घटना भक्तांच्या जीवनचरित्रांमध्ये आहेत.यापुढे महाराजांनी सांगितले की, पतीने स्वत:च्या पत्नीपासून काहीच लपवायला नको. पत्नीशी लपवाछपवी खाईत जाण्यासारखे आहे. पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे.याप्रसंगी प्रामुख्याने महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, समितीचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, पोद्दारेश्वर राममंदिरचे विश्वस्त प्रदीप अग्रवाल, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, प्रा. निरंजन देशकर, विहिंपचे अजय निलदावार, प्रदीप सिंह, समाजसेवक जयप्रकाश गुप्ता, मुन्ना महाजन, श्रीकांत देशपांडे, राजेंद्र पुरोहित उपस्थित होते. रामकथा १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कथेची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत आहे.(प्रतिनिधी)