शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

समाजावर संस्कार करते रामकथा

By admin | Updated: January 12, 2016 03:24 IST

संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले.

विजय कौशल महाराज : रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सुरुवातनागपूर : संपूर्ण रामकथेमध्ये सामाजिक जीवन समृद्ध करणारे संस्कार सामावलेले आहेत, असे प्रतिपादन विजय कौशल महाराज यांनी केले. श्री रामदेवबाबा सार्वजनिक समितीतर्फे काटोल रोडवरील श्री रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्री रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. महोत्सवात बोलताना विजय कौशल महाराज यांनी रामकथेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, भगवान शिव हे देवी पार्वती यांना रामकथा सांगण्यापूर्वी त्यामागची भूमिका स्पष्ट करतात. या भूमिकेपासून रामकथेला सुरुवात होते. भगवान शिव हे पार्वतीला म्हणतात, देवी तूने समाजासाठी कल्याणकारी व पवित्र रामकथा ऐकविण्याचा आग्रह केला आहे. यामुळे तुझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही. देव निर्गुण व निराकार आहे किंवा तो न निर्गुण आहे न निराकार. नास्तिक लोक देवाचे अस्तित्व व त्यांच्या भक्तीवर नाना टीका करतात. देवाला नैवेद्य का ठेवायचा, मूर्तीची पूजा कशाला करायची, देव बोलत का नाही असे प्रश्न विचारले जातात. वास्तविक देव तोच आहे, जो भक्ताच्या मनात असलेल्या रूपात प्रगट होतो. भक्तासाठी देव नोकर, मित्र, सहकारी यासह कित्येक विविध रूपात प्रगट झाले आहेत. अशा अनेक घटना भक्तांच्या जीवनचरित्रांमध्ये आहेत.यापुढे महाराजांनी सांगितले की, पतीने स्वत:च्या पत्नीपासून काहीच लपवायला नको. पत्नीशी लपवाछपवी खाईत जाण्यासारखे आहे. पत्नीला सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे.याप्रसंगी प्रामुख्याने महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, मिलिंद माने, समितीचे अध्यक्ष बनवारीलाल पुरोहित, गोविंदलाल अग्रवाल, पोद्दारेश्वर राममंदिरचे विश्वस्त प्रदीप अग्रवाल, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, प्रा. निरंजन देशकर, विहिंपचे अजय निलदावार, प्रदीप सिंह, समाजसेवक जयप्रकाश गुप्ता, मुन्ना महाजन, श्रीकांत देशपांडे, राजेंद्र पुरोहित उपस्थित होते. रामकथा १८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. कथेची वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत आहे.(प्रतिनिधी)