शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

By योगेश पांडे | Updated: January 22, 2024 19:24 IST

Nagpur News: अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत.

- योगेश पांडे नागपूर - अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत. समाजाला सर्व कलह, वाद दूर सारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी सामंजस्याने मार्गक्रमण करावे लागेल. हेच नागरिकांचे तप ठरेल, अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.

आजचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी पंतप्रधानांनी कठोर व्रत केले. मात्र केवळ त्यांनी व्रत करून होणार आहे का? सर्वांचीदेखील देशाप्रति जबाबदारी आहे. अयोध्येत कुठलाही कलह व द्वेष नाही अशी नगरी आहे. मात्र तो कलह झाला म्हणून राम वनवासात गेले होते. आता पाचशे वर्षांनंतर ते परत अयोध्येत आले आहेत. त्यांचे तपस्या, परिश्रमाला नमन आहेच. जो आजच्या सोहळ्याचा इतिहास ऐकेल त्याला राष्ट्रासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळेल. मात्र या सोहळ्यातून आपल्यासाठी कर्तव्याचा आदेशदेखील आहे. रामराज्यात सामान्य नागरिकांसाठी विशेष वर्णन आहे. आपल्यालादेखील सर्व कलह, वाद दूर करावे लागतील. लहान वादांतून भांडण करण्याची सवय सोडावी लागेल. सामान्य नागरिक प्रामाणिकपणे वागणारे हवेत. सत्य, करुणा, शुचिता, तप यांचे युगानुकूल आचरण असले पाहिजे. जनतेला एकमेकांसोबत समन्वय साधून मार्गक्रमण करावे लागेल. हेच सत्याचे आचरण ठरेल. सेवा व परोपकार हे करुणेचे आचरण आहे. सरकारच्या गरिबांसाठी अनेक योजना आहेत. मात्र जेथे वंचित दिसतील तेथे मदतीसाठी धाव घेतली पाहिजे. जास्तीत जास्त दान केले पाहिजे. शुचितेसाठी संयम बाळगला पाहिजे. इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. अशी शुचिता बाळगणे गरजेचे आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

समाज, कुटुंबात वावरताना शिस्त बाळगामहात्मा गांधी म्हणायचे की प्रत्येकाची गरज भागविण्याची क्षमता पृथ्वीत आहे, मात्र सर्वांच्या मनातील लोभ मात्र ती पूर्ण करू शकत नाही. लोकांनी आपले जीवन, कुटुंब, समाजात शिस्तीने वागायला हवे. नागरिकांनी दुसऱ्यांप्रति संवेदना बाळगणे व शिस्तीने वागणे हीच देशभक्ती आहे. पंतप्रधानांसारखे देशासाठी सर्वांनीच तप केले पाहिजे. तरच देश विश्वगुरू बनेल. त्यांचे व या भूमीसाठी बलिदान करणाऱ्यांचे व्रत आपल्याला समोर घेऊन जायचे आहे. कर्तव्याची आठवण देऊन कृतीप्रवण करण्यासाठी रामलल्ला आले आहेत. मंदिर निर्माण पूर्ण होईपर्यंत विश्वगुरू भारताचे निर्माण शक्य होईल अशी क्षमता आपल्या देशात आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या