शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रामलल्ला देशाचा ‘स्व’ घेऊन परतले, आता वादांना दूर करत मार्गक्रमण करा, मोहन भागवत यांचं आवाहन

By योगेश पांडे | Updated: January 22, 2024 19:24 IST

Nagpur News: अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत.

- योगेश पांडे नागपूर - अयोध्येत आज रामलल्लासोबतच भारताचा ‘स्व’ परतला आहे. संपूर्ण जगाला संकटांपासून वाचविणारा नवीन भारत उभा होईल याचे प्रतीक हा सोहळा बनला आहे. मात्र या सोहळ्यातून कर्तव्याचादेखील भगवान राम आदेश देत आहेत. समाजाला सर्व कलह, वाद दूर सारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी सामंजस्याने मार्गक्रमण करावे लागेल. हेच नागरिकांचे तप ठरेल, अशी भावना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.

आजचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी पंतप्रधानांनी कठोर व्रत केले. मात्र केवळ त्यांनी व्रत करून होणार आहे का? सर्वांचीदेखील देशाप्रति जबाबदारी आहे. अयोध्येत कुठलाही कलह व द्वेष नाही अशी नगरी आहे. मात्र तो कलह झाला म्हणून राम वनवासात गेले होते. आता पाचशे वर्षांनंतर ते परत अयोध्येत आले आहेत. त्यांचे तपस्या, परिश्रमाला नमन आहेच. जो आजच्या सोहळ्याचा इतिहास ऐकेल त्याला राष्ट्रासाठी कार्य करण्याची ऊर्जा मिळेल. मात्र या सोहळ्यातून आपल्यासाठी कर्तव्याचा आदेशदेखील आहे. रामराज्यात सामान्य नागरिकांसाठी विशेष वर्णन आहे. आपल्यालादेखील सर्व कलह, वाद दूर करावे लागतील. लहान वादांतून भांडण करण्याची सवय सोडावी लागेल. सामान्य नागरिक प्रामाणिकपणे वागणारे हवेत. सत्य, करुणा, शुचिता, तप यांचे युगानुकूल आचरण असले पाहिजे. जनतेला एकमेकांसोबत समन्वय साधून मार्गक्रमण करावे लागेल. हेच सत्याचे आचरण ठरेल. सेवा व परोपकार हे करुणेचे आचरण आहे. सरकारच्या गरिबांसाठी अनेक योजना आहेत. मात्र जेथे वंचित दिसतील तेथे मदतीसाठी धाव घेतली पाहिजे. जास्तीत जास्त दान केले पाहिजे. शुचितेसाठी संयम बाळगला पाहिजे. इतरांच्या मतांचा आदर केला पाहिजे. अशी शुचिता बाळगणे गरजेचे आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

समाज, कुटुंबात वावरताना शिस्त बाळगामहात्मा गांधी म्हणायचे की प्रत्येकाची गरज भागविण्याची क्षमता पृथ्वीत आहे, मात्र सर्वांच्या मनातील लोभ मात्र ती पूर्ण करू शकत नाही. लोकांनी आपले जीवन, कुटुंब, समाजात शिस्तीने वागायला हवे. नागरिकांनी दुसऱ्यांप्रति संवेदना बाळगणे व शिस्तीने वागणे हीच देशभक्ती आहे. पंतप्रधानांसारखे देशासाठी सर्वांनीच तप केले पाहिजे. तरच देश विश्वगुरू बनेल. त्यांचे व या भूमीसाठी बलिदान करणाऱ्यांचे व्रत आपल्याला समोर घेऊन जायचे आहे. कर्तव्याची आठवण देऊन कृतीप्रवण करण्यासाठी रामलल्ला आले आहेत. मंदिर निर्माण पूर्ण होईपर्यंत विश्वगुरू भारताचे निर्माण शक्य होईल अशी क्षमता आपल्या देशात आहे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या