शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
4
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
5
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
6
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
7
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा सणसणीत टोला
8
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
9
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
10
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
11
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
12
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
13
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
14
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
15
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
16
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
17
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
18
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
19
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
20
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!

राजीव गांधी पंचायत अभियानाच्या कर्मचाऱ्यांना लागली घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:34 IST

पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याऐवजी त्यांना ३१ मार्चपर्यंत इतर नोकरी शोधण्याचे आदेश शासनाने दिल्याने, राज्यभरात या अभियानात कार्यरत १०८ कर्मचाऱ्यांना बेकार होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशासनाने अभियानाचे केले दुसऱ्या योजनेत रूपांतर३१ मार्चपूर्वी इतर नोकरी शोधण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंचायत राज कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या हेतूने २०१४ या वर्षात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू करण्यात आले होते. परंतु शासनाने या अभियानाचे रूपांतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समायोजित करण्याऐवजी त्यांना ३१ मार्चपर्यंत इतर नोकरी शोधण्याचे आदेश शासनाने दिल्याने, राज्यभरात या अभियानात कार्यरत १०८ कर्मचाऱ्यांना बेकार होण्याची वेळ आली आहे.नागपूर जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात दोन पदे कार्यरत आहेत़ विदर्भात या पदांची संख्या ४१ इतकी आहे़ ही सर्व पदे कंत्राटी तत्त्वावर आहेत़ २० फेब्रुवारीला शासनाने काढलेल्या आदेशामुळे आपली नोकरी जाईल, ही चिंता त्यांना सतावते आहे़ वस्तुत: राजीव गांधी पंचायत अभियान आणि राष्ट्रीय ग्राम स्वराजचा हेतू एकच आहे़ कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करून ही योजना त्यांच्याच अनुभवाच्या जोरावर अधिक कारणी लागली असती़ असे न करता शासनाने सेवा संपुष्टात आणण्याची तंबी त्यांना दिली आहे. ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी शशांक बर्वे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला प्राप्त झाला आहे़ ही योजना आदिवासीबहुल जिल्ह्यात पेसाअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये राबविण्यात येते. पेसा समन्वयक या नावाने योजनेतील कंत्राटी कर्मचारी काम करतात़ ती पदे जवळपास २,६६७ इतकी आहे़ ही पदे शासनाच्या मोहिमा, योजनांची जनजागृतीसाठी मदत करतात़ १०८ पदे अंमलबजावणीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. आठ दिवसानंतर नोकरी जाणार या भीतीने सर्व कर्मचारी हतबल झाले आहेत़ पुढे काय, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना आहे़

टॅग्स :Employeeकर्मचारीgram panchayatग्राम पंचायत