शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

राजेंद्र गवई यांची काँग्रेसवर नाराजी : आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:38 IST

काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदर्यापूर व अचलपूरची जागा सोडावी : पडलेल्या जागाही काँग्रेंस सोडायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत राहील की नाही, याबाबत काँग्रेस अजूनही अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसरीकडे काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.शनिवारी रविभवन येथे पत्रपरिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. राजेद्र गवई यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. तेव्हा आम्ही लोकसभेची एकही जागा मागितली नव्हती. परंतु विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील, असे तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते. आता विधानसभेसाठी आम्ही काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघातून काँग्रेस गेल्या अनेक वर्षात निवडून आलेली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु काँग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. आ. विरेंद्र जगताप यांच्या दबावामुळे काँग्रेस अचलपूरची जागा रिपाइंला सोडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंला न सोडल्यास काँग्रेसला मोठे नुकसान होईल. आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही आपला विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन जागा सोडत असतील तरच काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा होईल, अन्यथा आम्ही आघाडीतून बाहेर पडू आणि अमरावती जिल्ह्यातील ८ मतदारसंघासह महाराष्ट्रातील ५० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बच्चू कडू यांच्याविरुद्ध लढण्यास तयारडॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले की, अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून आ. बच्चू कडू हे सातत्याने निवडून येतात. कॉंग्रेस ही जागा सातत्याने हरत आहे. आ. कडू यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरुद्ध मी स्वत: लढण्याचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु काँग्रेस मला हे आव्हान स्वीकारू देण्यासही तयार नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMediaमाध्यमे