शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

राजेंद्र गवई यांची काँग्रेसवर नाराजी : आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:38 IST

काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देदर्यापूर व अचलपूरची जागा सोडावी : पडलेल्या जागाही काँग्रेंस सोडायला तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत राहील की नाही, याबाबत काँग्रेस अजूनही अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसरीकडे काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.शनिवारी रविभवन येथे पत्रपरिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. राजेद्र गवई यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. तेव्हा आम्ही लोकसभेची एकही जागा मागितली नव्हती. परंतु विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील, असे तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते. आता विधानसभेसाठी आम्ही काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघातून काँग्रेस गेल्या अनेक वर्षात निवडून आलेली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु काँग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. आ. विरेंद्र जगताप यांच्या दबावामुळे काँग्रेस अचलपूरची जागा रिपाइंला सोडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंला न सोडल्यास काँग्रेसला मोठे नुकसान होईल. आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही आपला विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन जागा सोडत असतील तरच काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा होईल, अन्यथा आम्ही आघाडीतून बाहेर पडू आणि अमरावती जिल्ह्यातील ८ मतदारसंघासह महाराष्ट्रातील ५० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.बच्चू कडू यांच्याविरुद्ध लढण्यास तयारडॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले की, अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून आ. बच्चू कडू हे सातत्याने निवडून येतात. कॉंग्रेस ही जागा सातत्याने हरत आहे. आ. कडू यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरुद्ध मी स्वत: लढण्याचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु काँग्रेस मला हे आव्हान स्वीकारू देण्यासही तयार नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणMediaमाध्यमे