शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:40 IST

त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले.

ठळक मुद्देप्रकाश रामटेके यांनी जागविल्या आठवणी : तरुणांमध्ये स्फूर्ती भरणारा पँथर

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले. १० हजाराच्यावर तरुण कार्यकर्ते या मशाल मोर्च्यात सहभागी झाले होते. रात्रभर हा मोर्चा शहरात फिरला व पहाटे इंदोरा बुद्ध विहारात त्याचे समापन झाले.दलित पँथरचे संस्थापक, कवी, विचारवंत व साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यावेळी पँथरचे विदर्भ संयोजक प्रकाश रामटेके यांनी या लढाऊ पँथरच्या आठवणींना उजाळा दिला. राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पुढे राहून नेतृत्व करणारे नेते होते. वैयक्तिकरीत्या अतिशय शांत व गंभीर राहणारे राजा ढाले भाषण करताना मात्र प्रचंड आक्रमक असायचे. त्यांनी लेखनाने, भाषणाने व विचाराने तरुणांमध्ये आंबेडकरी चळवळीची स्फूर्ती जागविली होती. प्रत्येक तरुण त्यांच्या बोलण्याने झपाटला होता. कोणत्याही घरात ज्येष्ठ माणसे रिपब्लिकन पार्टीत असली तरी त्या घरातील तरुण मात्र कट्टर पँथर झाला होता. राजा ढाले १९७३ साली पहिल्यांदा नागपूरला आले होते. त्यावेळी गाजलेल्या एरणगाव नरबळी प्रकरणात काढलेल्या मोर्चात नामदेव ढसाळ यांच्यासह ते सहभागी झाले होते. त्यानंतर दलित पँथरच्या विदर्भातील संघटनेत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेतलेल्या बैठकीत ते आले होते व त्यांनीच विदर्भ संयोजक म्हणून आपली निवड केल्याचे रामटेके यांनी सांगितले. १९७५ साली बाबासाहेबांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे बाबू जगजीवनराम हे दीक्षाभूमीवर भेटीसाठी आले होते. दलित पँथरने या भेटीला प्रचंड विरोध केला होता. त्यावेळी ‘जगजीवनराम गो बॅक’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रोडवर उभे होते. सामोर ढाले होते.एका पोलिसाने त्यांच्या अंगावरून बुलेट आणण्याचा प्रयत्न केला पण ते हटले नाही. त्यांना जबर दुखापत झाली होती. ही त्यांची आक्रमकता तरुणांना भावली होती. तरुणांमध्ये आंबेडकरवाद जागविण्याचे काम त्यांनी केले होते. हा पँथर आज हरविल्यासारखे वाटत असल्याची भावना प्रकाश रामटेके यांनी व्यक्त केली.जुन्या पुस्तकांच्या बाजारात तासन्तास घालवायचेआंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नरेश वाहाने यांनीही राजा ढाले यांच्या आठवणी मांडल्या. जुन्या पुस्तकांच्या बाजारात वाहाने यांचे पुस्तकांचे दुकान होते. ढाले त्यांना ‘दोस्त’ मानायचे. नागपूरला आले की त्यांच्या दुकानात तासन्तास पुस्तक वाचत बसायचे. चळवळीच्या गोष्टी करायचे. समता सैनिक दलातर्फे केतन पिंपळापुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कारवितरण समारंभात ते आले होते. त्यांची प्रकृती खालावली होती पण आक्रमकता आजही तशीच होती. त्यांचे भाषण आजही स्फूर्ती देणारे आहे. साप्ताहिकाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना येण्यासाठी विनंती केली होती. मात्र आता ते कधीही येऊ शकणार नाही. एक लढाऊ पँथर समाजाने कायमचा गमावला आहे.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनMorchaमोर्चाnagpurनागपूर