शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अन् मशाल मोर्चात रात्रभर शहरात फिरल होते राजा ढाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:40 IST

त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले.

ठळक मुद्देप्रकाश रामटेके यांनी जागविल्या आठवणी : तरुणांमध्ये स्फूर्ती भरणारा पँथर

निशांत वानखेडे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : त्यावेळी नामांतरणाचे आंदोलन चांगलेच पेटले होते. औरंगाबादच्या आंदोलनाला समर्थन करताना नागपुरातही ५ ऑगस्ट १९७८ रोजी विशाल मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा परत येत असताना १० नंबर पुलाजवळ पोलिसांनी मोर्चावर गोळीबार केला ज्यामध्ये पाच तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध म्हणून १५ ऑगस्टला काळा स्वातंत्र्य दिन पाळण्याचा निर्णय दलित पँथरने घेतला. त्याअंतर्गत मशाल मोर्चा काढल्या जाणार होता व याचे नेतृत्व राजा ढाले यांच्याकडे होते. पोलीस आयुक्तांनी परवानगी नाकारली व कार्यकर्त्यांना अटक करण्याचा इशारा दिला. मात्र १४ ऑगस्टच्या रात्री राजा ढाले स्वत: हातात मशाल घेऊन मोर्चात सहभागी झाले. १० हजाराच्यावर तरुण कार्यकर्ते या मशाल मोर्च्यात सहभागी झाले होते. रात्रभर हा मोर्चा शहरात फिरला व पहाटे इंदोरा बुद्ध विहारात त्याचे समापन झाले.दलित पँथरचे संस्थापक, कवी, विचारवंत व साहित्यिक राजा ढाले यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यावेळी पँथरचे विदर्भ संयोजक प्रकाश रामटेके यांनी या लढाऊ पँथरच्या आठवणींना उजाळा दिला. राजा ढाले व नामदेव ढसाळ हे पुढे राहून नेतृत्व करणारे नेते होते. वैयक्तिकरीत्या अतिशय शांत व गंभीर राहणारे राजा ढाले भाषण करताना मात्र प्रचंड आक्रमक असायचे. त्यांनी लेखनाने, भाषणाने व विचाराने तरुणांमध्ये आंबेडकरी चळवळीची स्फूर्ती जागविली होती. प्रत्येक तरुण त्यांच्या बोलण्याने झपाटला होता. कोणत्याही घरात ज्येष्ठ माणसे रिपब्लिकन पार्टीत असली तरी त्या घरातील तरुण मात्र कट्टर पँथर झाला होता. राजा ढाले १९७३ साली पहिल्यांदा नागपूरला आले होते. त्यावेळी गाजलेल्या एरणगाव नरबळी प्रकरणात काढलेल्या मोर्चात नामदेव ढसाळ यांच्यासह ते सहभागी झाले होते. त्यानंतर दलित पँथरच्या विदर्भातील संघटनेत पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी घेतलेल्या बैठकीत ते आले होते व त्यांनीच विदर्भ संयोजक म्हणून आपली निवड केल्याचे रामटेके यांनी सांगितले. १९७५ साली बाबासाहेबांचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे बाबू जगजीवनराम हे दीक्षाभूमीवर भेटीसाठी आले होते. दलित पँथरने या भेटीला प्रचंड विरोध केला होता. त्यावेळी ‘जगजीवनराम गो बॅक’ अशा घोषणा देत कार्यकर्ते रोडवर उभे होते. सामोर ढाले होते.एका पोलिसाने त्यांच्या अंगावरून बुलेट आणण्याचा प्रयत्न केला पण ते हटले नाही. त्यांना जबर दुखापत झाली होती. ही त्यांची आक्रमकता तरुणांना भावली होती. तरुणांमध्ये आंबेडकरवाद जागविण्याचे काम त्यांनी केले होते. हा पँथर आज हरविल्यासारखे वाटत असल्याची भावना प्रकाश रामटेके यांनी व्यक्त केली.जुन्या पुस्तकांच्या बाजारात तासन्तास घालवायचेआंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते नरेश वाहाने यांनीही राजा ढाले यांच्या आठवणी मांडल्या. जुन्या पुस्तकांच्या बाजारात वाहाने यांचे पुस्तकांचे दुकान होते. ढाले त्यांना ‘दोस्त’ मानायचे. नागपूरला आले की त्यांच्या दुकानात तासन्तास पुस्तक वाचत बसायचे. चळवळीच्या गोष्टी करायचे. समता सैनिक दलातर्फे केतन पिंपळापुरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पुरस्कारवितरण समारंभात ते आले होते. त्यांची प्रकृती खालावली होती पण आक्रमकता आजही तशीच होती. त्यांचे भाषण आजही स्फूर्ती देणारे आहे. साप्ताहिकाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात त्यांना येण्यासाठी विनंती केली होती. मात्र आता ते कधीही येऊ शकणार नाही. एक लढाऊ पँथर समाजाने कायमचा गमावला आहे.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनMorchaमोर्चाnagpurनागपूर