शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. ...

बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मृग नक्षत्रामध्ये बाजारगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची पेरणी केली. यंदा वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गत गुरुवारी मुसळधार पावसाने कोंब आलेले बियाणे दबल्या गेले. अधिक माती बियाण्यांवर आल्याने आणि नंतर पावसाने दडी मारल्याने बी जमिनीतच सडले. अशातच शेतकऱ्यांनी उसनवारी करीत पुन्हा बियाणे आणण्यासाठी धाव घेतली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला. गत १० दिवसापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणी केलेले बियाणेसुद्धा निघेनासे झाले. त्यामुळे निसर्गाचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला.

नागपूर ग्रामीण तालुक्यातील शिवा, सावंगा, बाजारगाव, सातनवरी, धामना, व्याहाड, पेठ, डिगडोह, देवळी गौराळा या गावामध्ये ९० टक्के पेरणी झाली असून, ७० टक्के शेतकऱ्यांना दुपार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

- हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकरक पाऊस होईल, असे वाटले. त्यानुसार मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने आम्ही पेरणी केली. गत गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने कापूस आणि सोयाबीन बियाणे दबल्या गेले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

- विलास उईके, शेतकरी, सावंगा