शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST

बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. ...

बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मृग नक्षत्रामध्ये बाजारगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची पेरणी केली. यंदा वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गत गुरुवारी मुसळधार पावसाने कोंब आलेले बियाणे दबल्या गेले. अधिक माती बियाण्यांवर आल्याने आणि नंतर पावसाने दडी मारल्याने बी जमिनीतच सडले. अशातच शेतकऱ्यांनी उसनवारी करीत पुन्हा बियाणे आणण्यासाठी धाव घेतली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला. गत १० दिवसापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणी केलेले बियाणेसुद्धा निघेनासे झाले. त्यामुळे निसर्गाचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला.

नागपूर ग्रामीण तालुक्यातील शिवा, सावंगा, बाजारगाव, सातनवरी, धामना, व्याहाड, पेठ, डिगडोह, देवळी गौराळा या गावामध्ये ९० टक्के पेरणी झाली असून, ७० टक्के शेतकऱ्यांना दुपार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

- हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकरक पाऊस होईल, असे वाटले. त्यानुसार मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने आम्ही पेरणी केली. गत गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने कापूस आणि सोयाबीन बियाणे दबल्या गेले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

- विलास उईके, शेतकरी, सावंगा