शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

विदर्भात संततधार; जनजीवन विस्कळित, पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:02 IST

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाबळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होताना दिसते आहे. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी सुखावला असून दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात २८.५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०६.४ मि.मि. इतका पाऊस नोंदवण्यात आला. पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त मात्र नाही.यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. आष्टोना नाल्याला पूर आल्याने वणी-मारेगाव-वडकी वाहतूक थांबली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तहसील अंतर्गत येत असलेल्या तेलवासा रोड वरील रेल्वेच्या भूयारी मार्गात मंगळवारी सकाळी चार फूट पाणी भरल्यामूळे घुग्गुसकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर असलेल्या चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोनाड या गावांचा भद्रावतीशी संपर्क तुटला आहे.वर्धा जिल्ह्यातही संततधार सुरू असून नदी-नाले पाण्याने भरून वाहत आहेत. गडचिरोलीतील काही गावांमधले लहान पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस