शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

विदर्भात संततधार; जनजीवन विस्कळित, पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:02 IST

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाबळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होताना दिसते आहे. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी सुखावला असून दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात २८.५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०६.४ मि.मि. इतका पाऊस नोंदवण्यात आला. पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त मात्र नाही.यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. आष्टोना नाल्याला पूर आल्याने वणी-मारेगाव-वडकी वाहतूक थांबली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तहसील अंतर्गत येत असलेल्या तेलवासा रोड वरील रेल्वेच्या भूयारी मार्गात मंगळवारी सकाळी चार फूट पाणी भरल्यामूळे घुग्गुसकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर असलेल्या चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोनाड या गावांचा भद्रावतीशी संपर्क तुटला आहे.वर्धा जिल्ह्यातही संततधार सुरू असून नदी-नाले पाण्याने भरून वाहत आहेत. गडचिरोलीतील काही गावांमधले लहान पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस