शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

विदर्भात संततधार; जनजीवन विस्कळित, पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:02 IST

गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.

ठळक मुद्देकाही गावांचा संपर्क तुटलाबळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होताना दिसते आहे. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी सुखावला असून दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात २८.५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०६.४ मि.मि. इतका पाऊस नोंदवण्यात आला. पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त मात्र नाही.यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. आष्टोना नाल्याला पूर आल्याने वणी-मारेगाव-वडकी वाहतूक थांबली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तहसील अंतर्गत येत असलेल्या तेलवासा रोड वरील रेल्वेच्या भूयारी मार्गात मंगळवारी सकाळी चार फूट पाणी भरल्यामूळे घुग्गुसकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर असलेल्या चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोनाड या गावांचा भद्रावतीशी संपर्क तुटला आहे.वर्धा जिल्ह्यातही संततधार सुरू असून नदी-नाले पाण्याने भरून वाहत आहेत. गडचिरोलीतील काही गावांमधले लहान पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊस