शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

नागपूर जिल्ह्यात पाऊस थांबला, पुराचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:14 IST

संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.पुराचे पाणी सखल भागासह गावांमध्ये शिरल्याने एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉण्ड फोर्स), एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा,कामठी, पारशिवनी आणि कुही या चार तालुक्यांमधील या दोन्ही नदीकाठच्या ४८ गावांमधील ४५४७ कुटुंबातील २६,४९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या पुरात हजारो लोक पाण्यात अडकले आहेत.इकडे रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. 

पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरने फूड पॅकेट्स पुरविलेपूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, एनएमसी, तसेच स्थानिक शोध बचाव पथक यांची सेवा घेण्यात आली आहे. यांच्या मदतीने आतापर्यंत चार तालुक्यातील २६,४९० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदत कार्य अजूनही सुरूच आहे. रविवारी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप या गावाात ७५० फूड पॅकेट व पाण्याची बॉटल हेलिकॉप्टरमधून जवळपास २५० पूरग्रस्तांना पुरवण्यात आली. कुही तालुक्यात एनडीआरएफ, व एसडीआरएफच्या पथकासह आर्मीचेही पथक तैनात आहेत.

एनडीआरएफच्या टीम दाखलबचावकार्याला वेग देण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफच्या चार टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या पथकांनी टेकेपार येथे एनडीआरएफ तर चिचघाट, चिकना, सोनेगाव येथे एसडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य केले. चिचघाट येथे सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

टॅग्स :floodपूर