शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

नागपूर जिल्ह्यात पाऊस थांबला, पुराचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:14 IST

संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.पुराचे पाणी सखल भागासह गावांमध्ये शिरल्याने एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉण्ड फोर्स), एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा,कामठी, पारशिवनी आणि कुही या चार तालुक्यांमधील या दोन्ही नदीकाठच्या ४८ गावांमधील ४५४७ कुटुंबातील २६,४९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या पुरात हजारो लोक पाण्यात अडकले आहेत.इकडे रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. 

पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरने फूड पॅकेट्स पुरविलेपूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, एनएमसी, तसेच स्थानिक शोध बचाव पथक यांची सेवा घेण्यात आली आहे. यांच्या मदतीने आतापर्यंत चार तालुक्यातील २६,४९० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदत कार्य अजूनही सुरूच आहे. रविवारी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप या गावाात ७५० फूड पॅकेट व पाण्याची बॉटल हेलिकॉप्टरमधून जवळपास २५० पूरग्रस्तांना पुरवण्यात आली. कुही तालुक्यात एनडीआरएफ, व एसडीआरएफच्या पथकासह आर्मीचेही पथक तैनात आहेत.

एनडीआरएफच्या टीम दाखलबचावकार्याला वेग देण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफच्या चार टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या पथकांनी टेकेपार येथे एनडीआरएफ तर चिचघाट, चिकना, सोनेगाव येथे एसडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य केले. चिचघाट येथे सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

टॅग्स :floodपूर